महार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २६ फेब्रुवारी, २०२३

महार समाजाचा शिवकाळ व पेशवाईतील शूरवीरांचा इतिहास

 


महार समाजाचा  शिवकाळ व पेशवाईतील  शूरवीरांचा इतिहास


1) सातवहान राजवटीत नाव=महारक्ख ते महारक्षक ( महार).

2)मोगलांशी झुंज देवून वैराटगड जिंकणारा= नागनाक  महार नागेवाडी वाई सातारा. छत्रपती राजाराम यांनी दिलेले इनाम= पाटील की  नागेवाडी गाव हे वतन म्हणून देण्यात आले.

3)  जीवाजी महाराची कामगिरी= प्रतापगडच्या  सुभान  खान व बेदरच्या अब्दुल शहाचे बंड शमवले. बंगालच्या वाघास पिंजर्‍यात बंद करून आणले(आठ  परगण्याची सरनाईक की)म्हणून बक्षीस दिले.

4) वाल्हे येथील महारांची कामगिरी= श्री  शिवाजी महाराजांची कन्या सखुबाई  एकदा संकट कोसळले असता तिचे रक्षण केले.

5) रायनाक महार= दुसर्‍या बाजीरावाच्या काळात रायगड किल्ल्याचा किल्लेदार (इंग्रजांशी लढताना ठार).

6) सिद्धनाक पहिला= बहमनी राज्याचे सेनापती होते.

7) सिद्धनाक  महाराचा नातू तिसरा (सिदनाक महार उर्फ सिद्धनाक बाजी हा होय)= छत्रपती शिवाजी महाराजांना वाई प्रांतात लष्करी मदत, जावळीच्या चंद्रराव मोरया'च्या पाडव करण्यास मदत.

8) सिद्धनाक 3रा उर्फ सिद्धनाक बाजी=अफजल खानाच्या वधानंतर  प्रताप गडाच्या पायथ्याशी  झालेल्या  लढाईत मोठा पराक्रम दाखवला.

9) तिसऱ्या सिद्धनाक याचा मुलगा  कृष्णनाक महार= वाई प्रांतात मराठा व मोगल लढाईत ठार झाला.

10) पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार= चीव्हे नाईक (महार) रा. ठी.अवसरी ता. पुरंदर जि.पुणे.

11) प्रत्येक किल्ल्यावरील  मेटनाइकी=त्यात महार समाजाचा भरणा जास्त होता.

12) सातारा  किल्ला मेटनाइकी=महादनाक कलद राजनाक  महार यांचेकडे होते.

13) महार  समाजाची लष्करी पथके= हुलस्वार पथक, पायदळ, किल्लेदार मेटनाइकी, अंगरक्षक.

14) शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे भगवे निशान तयार करून देणार, सातारा सदाशिव पेट ढाले पणाचे  वतन देण्यात  आले=महादनाक  सरदार.

15) छत्रपती शाहू यांस सातारच्या गादीवर बसविण्यास मदत= सिद्धनाक महार तिसरा कळम (कळकी)  हे गाव इनाम (वतन) देण्यात आले.

16) सण 1659 साली बाजी  पासलकर यांनी शौर्य गाजवून सिधीचा तालिबानी राजवटीचा पराभव केला त्यांचा अंगरक्षक=खंड्या महार ( अंगरक्षक)

17) वसईच्या रणसंग्राम  महारांची कामगिरी 

(युद्धाचे सामान पाण्यातून युद्धाचे ठिकाणी   पोहोचवण्याचे अवघड काम केले)= तुकनाक महार याने मांडवी कडील मोर्चा संभाळून टक्कर दिली त्यावेळी त्याचा गौरव करण्यात आला, सोन्याचे कडे बक्षीस देण्यात आले.

18) खरड्याची लढाई  व सिद्धनाक महार चौथा (शेवटचा) सरदार-परशुरामभाऊ पटवर्धन यांचे प्राण वाचविले =मराठे व निजाम 11मार्च 1715 रोजी आपल्या पथकासह लढाईत शौर्य दाखवले यात निजामचा पराभव झाला.

19) रायप्पा महार= लाखोंच्या फौजेत घुसून

शंभूराजांना  वाचवण्याचा प्रयत्न रायप्पा महार यांनी केला व स्वतःचे बलिदान दिले.

20)   धोंडनाक  सरदार=(कोंडाणा किल्ल्यावरील 'महार' वीरांची कर्तबगारी)=  मुघलांच्या ताब्यातील कोंडाणा किल्ला सण 6 फेब्रुवारी 1670  घनघोर लढाईत सहभाग.

21) मिरज जवळील कळंबीचे सिद्धनाक सरदार=  सण 1761 साली तिसऱ्या पानिपतच्या लढाईत होते आणि  त्यांना  शुरवीर मरण आले( मिरज इतिहास संशोधन मंडळ) (इतिहासकार - मानसिंग कुमठेकर सांगली) व  हुलस्वार पथकासह सहभागी झाले होते.

22) विठू (महार)=  आदिलशहाच्या कैदेत असलेले दामाजी पंत यांची सुटका  करून त्याच्या मोबदल्यात सोन्याच्या मोहरा  विठू महार यांनी दिल्या.

23) मदारी  मेहत्तर= औरंगजेबाच्या कैदेतून  छत्रपती शिवाजी  महाराज यांना सोडवण्यासाठी मदत केली  व आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

24)गोविंद गोपाळ महार= वडू बुदृक भिमा  कोरेगाव  येथे संभाजी महाराजांची समाधी  बांधण्यास जागा दिली व महार  वाड्यात छत्रपती शाहू महाराज यांनी समाधीस बांधल्या बद्दल  त्यांना सनद देऊन जमीन ईनाम म्हणून  देण्यात आली.

25)नागनाक सरदार=  मुघलांच्या ताब्यात असलेला वैराटगड जिंकून  स्वराज्यात सामील केला.  छत्रपती राजाराम यांनी  वैराट गड जिंकून दिल्याबद्दल नागनाक यास नागेवाडी हे गाव इनाम म्हणून देण्यात आले व पाटील की  बक्षीस देण्यात आली.

[लेखक= डॉ. अनिल कटारे, संजय सोनवणी, सर चिंतामण मोरे, डॉ. कैलास फुलमाळी, डॉक्टर कृष्णकांत क. डोंगरे, डॉ. पी.ए.  गवळी, चांगदेव भ. खैरमोडे,प्रो.  विलास खरात,विश्वास पाटील ( पानिपत कार).]

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०२३

पूर्वीच्या काळी मुंबई पुणे प्रवासासाठी १८ तास लागायचे धोंडी महार

धोंडी महार


अठराव्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यात "थिओडोर कुक" या बोरघाटात ग्रेट इंडीयन पेनिनसूला रेल्वेसाठी काम करणाऱ्या ब्रिटीश अभियंत्याने धोंडी महार या त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कामगाराच्या मदतीने खंडाळा घाटातील वनस्पतींच्या नोंदी करून सखोल अभ्यास केला आणि "फ्लोरा ऑफ दि प्रेसिडेंन्सी ऑफ बाॅम्बे" हा वनस्पती शास्त्रावरील अप्रतिम ग्रंथ लिहिला. आणि हा ग्रंथ त्याने त्यावेळी  त्याच "धोंडी महार" या व्यक्तीस सादर अर्पण केला होता त्याची गोष्ट.....



मुंबईत रेल्वे आली होती. पण पुण्यात येण्यासाठी रेल्वेमार्ग नव्हता त्या काळतली ही गोष्ट. पूर्वीच्या काळी मुंबई पुणे प्रवासासाठी १८ तास लागायचे. इतक्या कमी वेळात पुण्यातून मुंबईस जाता येतं म्हणून लोक खूषीत असायचे.


तो प्रवास कसा असायचा, तर पुण्याची गाडी खंडाळ्याला आली की, सगळ्या लोकांना खाली उतरवून तिथून पालख्या, डोल्या, खुर्च्या नि बैलगाड्यात बसवून सर्वांना घाटाखाली खोपोलीत आणले जायचे. ठाकर आणि कातकरी लोकांच्याकडे सामान वहाण्याचे काम होते. लोकांना अशा प्रकारे खंडाळ्यातून खोपोलीस घेवून जाण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटची या पारशी व्यापाऱ्याकडे होते. हा प्रवास अठरा तासात पूर्ण व्हायचा आणि इतक्या कमी वेळात पुणे-मुंबई प्रवास होतो म्हणून लोक खूष असायचे.


याच काळात कर्जत पळसदरी वरून बोरघाट खोदण्याचे काम चालू होते. इंग्रज अभियंता असलेला थिओडोर कुक यांच्या मार्गदर्शनाखाली बोरघाटात रेल्वे लाईन टाकण्याचे व बोगदे खोदण्याचे काम सुरू होते.


आजही घाट पाहिल्या नंतर जाणवते की, त्याकाळात पुरेशा सोईसुविधा नसताना देखील हे काम कसे केले असेल. या कामासाठी लाखांहून अधिक कामगार दिवसरात्र खपत होते. कोणतीही यांत्रीक अवजारं नसल्याने मजुरांकरवी साधी घमेली, फावडे व लोखंडी पहारी अशी जुजबी हत्यारं वापरून हे काम चालायचे. सहाजिक त्यामुळे दररोज शेकडो अपघात होतं असत. 


दिवसाला याची गणती कशी होती तर दर दिवशी १०० एक अपघात व्हायचे. त्यामध्ये कित्येकांची हाडे तुटायची, कुणाच्या पायावर भल्लामोठ्ठा दगड पडायचा. खरचटण्या पासून जीवजाण्या अपघाता पर्यन्तच्या जखमा व्हायच्या. इतक्या मोठ्या कामगारांसाठी वैद्यकिय सेवा उभारणे ही त्यावेळी अशक्य कोटीतली गोष्ट होती. नाही म्हणायला आठ दहा डॉक्टर प्राथमिक उपचार करण्यासाठी तळ ठोकून असल्याच्या नोंदी मिळतात, मात्र लाखोंच्या संख्येने असणाऱ्या कामगारांवर उपचार करण्यासाठी असणारी डॉक्टरांची संख्या असून नसल्या सारखी होती.


अशा वेळी लाखभर लोकांसाठी उपचार असायचा तो धोंडी नावाच्या व्यक्तीचा. धोंडी इथेच मजूर म्हणून काम करीत होता पण त्याला वनस्पतीशास्त्राची चांगली  माहीती व जाणीव होती. कुणाचा पाय मुरगळला किंवा मोठमोठ्या जखमा झाल्या तर मजूर धोंडीकडे जात. तो जंगलातला पाला तोडून आणत आणि त्यावर  तात्काळ उपचार करीत असे. पिचलेली हाडे तो वनस्पतींचा लेप लावून ठिक करत असे. आपल्या डॉक्टरांकडून उपचार होत नाहीत पण इथे असणाऱ्या या धोंडी महार या व्यक्तीकडून कसे पटकन उपचार होतात, जखमा बऱ्या होतात असा प्रश्न मुख्य इंजिनियर असणाऱ्या थिओडोर कुक्स या अधिकाऱ्याला पडत असे.


त्याने धोंडी महार या व्यक्तीला सोबत घेतलं आणि संपूर्ण बोरघाट पालथा घातला. घाटात असणाऱ्या वनस्पतींची इत्यंभूत माहिती, त्यांचे औषधी गुणधर्म नोंद करुन घेतले. वनस्पतींचे नमुने गोळा करून त्यांची हुबेहुब चित्रं काढून घेतली आणि वनस्पतीशास्त्रावर इंत्यभूत माहिती असणारा इंग्रजी ग्रंथ लिहला. या ग्रंथाचे नाव ' फ्लोरा आॅफ दि प्रेसिडेंन्सी ऍट बाॅम्बे". वनस्पतीशास्त्रात हा ग्रंथ आजही आधारभूत गणला जातो.


विशेष म्हणजे कुकने हा ग्रंथ धोंडी महार या व्यक्तींस अर्पण केला. त्याने पुस्तका मध्ये हा ग्रंथ 'धोंडी महार' यास नम्रपणे  अर्पण करत असल्याचे नमुद केले आहे.


संदर्भ : प्रबोधनकार ठाकरे समग्र साहित्य

Gito Spy , voice recoder , audio +91 70575 73102 M- 9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो.