Dr. Babasaheb Ambedkar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Dr. Babasaheb Ambedkar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ३ मे, २०२३

बाबासाहेब,तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही.

 


बाबासाहेब,तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही.


उणेपूरे मिळालेले ६५ वर्षांचे आयुष्य

त्यात ३० वर्षे शिक्षणात 

आणि १९४६ नंतरचा काळ,

दिल्लीत व्यस्त राहीलेला.

अवघी २५ वर्षे  मिळाली बाबासाहेबांना 

चळवळ आणि लेखनाला.त्यात  तब्येतीची अजिबात साथ नाही. इतक्या थोड्या काळात हा माणूस नियतकालिके चालवतो, 

२३ ग्रंथ लिहितो,शेकडो लेख लिहून भाषणे करत राहतो.

मनुस्मृती दहन, चवदार तळे,काळाराम मंदिर आंदोलन,शिक्षणसंस्था स्थापना, 

राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुका, 

गोलमेज परिषदआणि हजारो मैलांचा प्रवास.वाचन लेखनावरची पकड सुटू न देता.हे सारे सारे तुम्ही ,कसे जमवले असेल , बाबासाहेब ?

याचा हिशोब मला लागत नाही.

आजच्या नेत्यांसारखे विमान,हेलिकॉप्टर हाताशी नाही, मिडिया,इलेक्ट्रॉनिक मिडियामधून पोहोचणे नाही,अनुयायांना संदेश द्यायला Whatsapp नाही की बोलायला फोन नाही.

खडबडीत रस्ते आणि रेल्वेतून

गावकुसाबाहेरच्या त्या नॉट रिचेबल वस्त्यावस्त्यावर  कसे वेगाने पोहोचले असतील बाबासाहेब ?

कसे पोहोचत असतील त्यांचे संदेश आंदोलनाचे,खेडी  सोडण्याचे आणि पोरांना शिकवण्याचे.पुन्हा ज्यांच्याशी संवाद करायचा,ती सारी माणसे टेक्नोसॅव्ही नसणारी.

फाटकी,निरक्षर,अन्यायाने पिचलेली,

भेदरलेली. 

त्यांना समजेल अशा भाषेत हा पदवी घेतलेला कायदेपंडित कोणत्या सुगम भाषेत बोलला असेल? की, ज्या  शब्दांनी गावच्या पाटलासमोर नजर वर न करणारी माणसे थेट व्यवस्थेची गचांडी पकडू शकली.कधीही

न बघितलेल्या या माणसावर कशी श्रद्धा निर्माण झाली असेल खेड्यापाड्यातील माणसांची?

नुसत्या टाइम मॅनेजमेंटसाठी तुमचा अभ्यास करायला हवा बाबासाहेब,

आणि माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरलेल्या तुमच्या पद्धती समजून घ्यायला

हव्यात, कारण आज सगळी साधने हाताशी असूनही आम्ही गावकुसाबाहेरच्या  माणसांपासून अनरिचेबल आहोत, कोसो दूर....! 

4g camera ,SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera, technology gadgets
GITO
committed to give you more advanced service & products
regards
Satful Sonawane
Computer planet
7057573102

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी पत्नी रमाबाई यांना लिहिलेले पत्र

 डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी पत्नी रमाबाई यांना लिहिलेले पत्र 

दिनांक ३० डिसेंबर १९३० रोजी इंग्लंडहुन डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी पत्नी रमाबाई यांना लिहिलेले पत्र आजही काळीज पिळून टाकतं•••••



प्रिय रमा ,


कशी आहेस रमा तू ? 

तुझी आणि यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. 

मागल्या काही दिवसांतील माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे,प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो. आणि डोळयापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळयासमोर उभे राहिले.


दुःखांच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत. 

या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो आहे रमा ! पण मी झुंज देतो आहे. माझी बौध्दिक शक्ती परमवीर झाली होती जणू ! 

खूप भावना मनात दाटून आल्या आहेत.खूपच हळवे झाले आहे मन.खूपच व्याकूळ झाले आहे मन! आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली.तुझी आठवण आली.यशवंताची आठवण आली.


मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस.मी नको नको म्हणत होतो तरी तुझे मन तुला धरवले नाही. तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो.माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता. तू पाहत होतीस. तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेनं तू ओथंबून झाली होतीस.तू शब्दांनी बोलत नव्हतीस; पण तुझे डोळे जे शब्दांनी सांगता येत नसते तेही सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळयातील आवंढा तुझ्या ओठांपर्यंत येऊन थडकत होता. ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळयातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती.


आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत.मन नाजूक झाले आहे.जीवात कालवाकालव होत आहे. कशी आहेस रमा तू ! आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतोय तो? त्याचे संधीवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा ! आपली चार मुलं आपल्याला सोडून गेलीत. आता आहे फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्त्वाचा आधार आहे आता. त्याला आपण जपलं पाहिजे. यशवंताची काळजी घे रमा ! 

यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत. तोवर ते जागे राहत. मला ती शिस्तच त्यांनी लावली. मी उठलो,अभ्यास सुरु केला की ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई. त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला. याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे. माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत. त्यांनी रात्रीचा दिवस केला. अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळे आली. फार फार आनंद वाटतो रमा आज.रमा यशवंताला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथांचा त्याने ध्यास घेतला पाहिजे.


रमा,   

वैभव,श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभोवती पाहते आहेसच.माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागे लागलेली असतात. त्यांची जीवनं जिथून सुरु होतात तिथच थांबलेली असतात.या लोकांची आयुष्ये जागा बदलीत नाहीत. आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्याजवळ दुःखांशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्रय, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकटे आपल्याला सोडीत नाहीत. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत


मागे अंधारच आहे. दुःखाचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे


आपणाला वेगळी दुनिया नाही.आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. 

आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपडयांची काळजी घे. त्याची समजूत घाल. त्याच्यात जिद्द जागव. मला तुझी सारखी आठवण येते. यशवंताची आठवण येते.


मला कळत नाही असं नाही रमा,मला कळतं की तू दुःखांच्या या वणव्यात स्वतः करपून जात आहेस. पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होते आहेस. पण रमा मी तरी काय करु ! एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्रय. दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा. वसा ज्ञानाचा !


मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचे यावेळी भान नाही; पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे. तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस. आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवीत आहेस म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे.


खरं सांगू रमा, मी निर्दय नाही. पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी सादही घातली, तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा ! मी कळवळतो. पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी ! म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुला, यशवंतालाही कधी झळा पोचतात. हे खरं आहे; पण यावेळी रमा मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेली आसवे पुसतो आहे. सुडक्याला सांभाळ रमा. त्याला मारु नको. मी त्याला असे मारले होते. त्याची आठवणही कधी त्याला करुन देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे.


माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना पार जाळून-पुरुन टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत.


रमा,

 तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळयात आसवं आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकूळ झाली आहेस.


रमा, 

तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर? तू मनःसाथी म्हणून मिळाली नसतीस तर? तर काय झालं असतं? केवळ संसारसुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गोवऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे,मुंबईत कोण पसंत करील.घराला ठिगळे लावणे,वस्त्रांना शिवत राहणे, एवढयाच काडयाच्या पेटीत महिना निभला पाहिजे, एवढेच ध्यान्य,एवढेच तेल-मीठ पुरले पाहिजे हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर? तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्या वेळी लगेच ओहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा ! माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता, सगळीच मोडतोड झाली असती. सगळाच मनःस्ताप झाला असता. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. जप स्वतःला जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेन काळजी करु नकोस.


सर्वांस कुशल सांग.

कळावे,

तुझा

भीमराव

लंडन

३० डिसेंबर १९३०.

बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३

अस्पृश्य जातीमधील संघर्ष


अस्पृश्य जातीमधील संघर्ष


        महाराष्ट्रातील महार हे नाग वंशाचे लोक असून, ते येथील मूळचे रहिवासी आहेत. राजकीय पराभवानंतर त्यांना अस्पृश्य बनविण्यात आले. अस्पृश्य वर्गातील मांग, चांभार व ढोर या जाती व्यवसायातून निर्माण झाल्या आहेत. या चारही अस्पृश्य जाती मेलेल्या ढोरावर आपला उदरनिर्वाह पेशवेकाळात करीत होत्या. त्यातील महार हे मेलेले ढोर ओढून त्याचे मांस खात होते.मांग हे ढोराच्या चरबी पासून वाद्ये तयार करून वाजवीत असत, चांभार हे ढोराच्या कातड्या पासून पादत्राणे तयार करीत, तर ढोर हे ढोराच्या शिंगा व हाडापासून बांगड्या व फण्या तयार करून विकत असत.


         पेशवे काळात महार, मांग, चांभार व ढोर अशा चार प्रमुख अतिशूद्र जाती होत्या. त्यांच्यातही लहान लहान व्यवसाया वरून अनेक उपजाती निर्माण झाल्या आणी त्या आपसात मानपान, दर्जा व हक्क यावरून संघर्ष करू लागल्या होत्या.


       भारताच्या दक्षिण भागात स्थित असलेल्या महाराष्ट्रात महार या जातीकडे वंशपरंपरागत कोतवाली होती आणी बहामनी सुलताना कडून 52 हक्क प्राप्त झाल्यामुळे सरकारी दरबारी या जातीला अधिक मान असे, तसा मांग, महार, चांभार व ढोर जातींना नव्हता. म्हणून महार आपल्याला या जातीपेक्षा उच्च समजत असत. बहामनी सुलतान कडून सर्व महार समाजाच्या लोकांना हे हक्क इ. स.1475 साली प्राप्त झाले होते. त्याची पुह्ना उजळणी इ. स.1563 साली महाराष्ट्राची अतिप्राचीन सातवाहन सम्राटाची राजधानी मुंगी पैठण येथे ब्राह्मण व इतर उच्च जातीच्या हक्कदाराची सभा एकनाथ स्वामींचे देवळात होऊन अठरा लाख सोमवंशीय महार जातीला हे 52 हक्क प्राप्त झाले होते. त्या काळात सर्वच महार जातीच्या लोकांना सोमवंशीय समजत असत. त्यानंतर पेशवे शाहीच्या काळात ते करीत असलेल्या लहान लहान धंद्यावरून महार समाजात अनेक उपजाती तयार झाल्या आणी त्या पुढील काळात पक्क्या झाल्या.


महार जातीतील पोटजाती -

      ते येणेप्रमाणे -

1) सोमस, 2) बावणे 3) बारके 4) कोसरे 5) लाडवन

6) आदवन 7) पानके 8)   येसकर 9) घोडके 10) डफळे  11)होलारे 12) कंकारे आणी अर्धी जात वरपारवडे ही होती.


      महार समाजातील पोट - जातींचे लोक काम धंद्याच्या शोधात ज्या ज्या खेड्यात किंवा मोठया गावात गेले तेथे त्यांनी आपल्या महार जाती पंचायती तयार केल्या. प्रत्येक उपजातीची एक जात पंचायत निर्माण झाली. पुढे त्यांच्यात दर्जा, हक्क व मानपान याबद्दल वाद - विवाद निर्माण होत गेले. सामाजिक बंधन तोडणाऱ्या व्यक्तीस महार जाती पंचायती द्वारे बहिष्कृत करण्यात येत असे, अशा बहिष्कृताची एक वेगळीच जात तयार झाली. ती वरपाखड्यांची अर्धी जात होय.जसे तांदळातून खडे किंवा सडी पाखडून बाहेर फेकल्या जातात तसेंच महार जातीतून कोणत्याही सामाजिक गुन्हा करिता समाजाबाहेर फेकल्या गेलेले लोक हे " वरपाखडे " होत. त्यांना अर्धी जात समजल्या जाते. अशाच प्रकारचे वर्गीकरण अस्पृश्य वर्गाच्या मांग, चांभार व ढोर या जातीत सुद्धा होत गेले.


      पेशवे शाहीच्या काळात ब्राह्मण समाजा पासून तर शूद्र - अतिशूद्र समाजापर्यत जाती - उपजातीची निर्मिती झाली. आणी संपूर्ण हिंदू समाज विस्कळीत होत गेला. परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे ब्राह्मणा सारख्या उच्च जातीत, जातीय व उप - जातीय संघर्ष जरी दिसत असला तरी त्यांचे सामाजिक संघटन अगदी मजबूत आहे. त्यांच्या सर्व धार्मिक - चालीरिती, विधी विधान, व कर्मठपणा ह्या सर्व ब्राह्मण वर्गा भोवती आजही अगदी पिंगा घालीत असतात. त्या पूर्ण करण्यात ते कोणतीही चूक करीत नाहीत. तत्कालीन निरनिराळ्या चालीरितीचे स्वरूप पाहता पेशव्यानी ब्राम्हणत्वाचा ( Brahminism ) उदोउदो करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. कारण त्यात संपूर्ण ब्राह्मण वर्गाचा फायदा होता.


        पूर्वी चार वर्णात विभागलेल्या वैदिक धर्म गुप्त काळात त्याचे रूपांतर हिंदू धर्मात झाले आणी पेशवाईचे काळापासून त्याची हिंदू जातीच्या अनेक तुकड्यात विभागणी होत गेली, असे असले तरीही धर्माच्या नावावर हिंदू लोक एक आहेत. हीच या धर्माची एक मोठी विशेषत: आहे. ब्राह्मण वर्गाने निर्माण केलेल्या हिंदू धर्माच्या अनेक जातीत विभागणी होत गेली असली आणी बहुजन समाजाची गणती शुद्रात होत असली तरी ब्राह्मणानी निर्माण केलेल्या जाती प्रथेवर बहुजन समाजाचा पक्का विश्वास बसलेला आहे. ते कर्म - कांड व पूजा -पाठामध्ये आकंठ डुबलेले आहेत. त्यांच्या गळ्याभोवती कर्म कांडाचे पाश पक्के गुरफटलेले असल्यामुळे ते बाजूला सारून आपला गळा मोकळा करून खुल्या पारदर्शी वातावरणात श्वास घेण्याची कल्पना, कोणताही बहुजन समाजातील हिंदू व्यक्ती करू शकत नाही आणी एखाद्याने तसें करण्याचा प्रयत्न केल्यास तो जाती बहिष्कृत ठरला जाईल ही भीती प्रत्येक हिंदू माणसाला जाणवत असते.


         अशा प्रकारे सामाजिक संघर्षातुन जाती - उपजातीची निर्मिती होत गेलेली आहे आणी ती आजही कायम आहे.


       पेशवे काळात अशा प्रकारच्या जाती - उपजातीचा संघर्ष चालत असतांना ब्राम्हण पुरोहित वर्गाने भोंदू अशा बहुजन समाजाला लुबाडण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या शोधून काढल्या त्यातील मुख्य म्हणजे नवीन नवीन देव - देवता यांची निर्मिती करणे व त्यांची देवळे बांधण्यास भोळ्या जनतेला प्रवृत्त करणे आणी त्याचे पुजारीपण आपल्याकडे घेणे हे होय!

Gito Spy , voice recoder , audio +91 70575 73102 M-9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो

      पेशवेकाळात सामाजिक संघर्ष चालत असतांना जाती - उपजाती मध्ये विभागलेल्या हिंदू धर्मातील लोक आपआपल्या जाती - उपजाती करिता वेगवेगळ्या देवाच्या नावाने अनेक देवालये बांधू लागले आहेत. ब्राह्मण वर्गाने आपले वर्चस्व बहुजन समाजावर कायम राहावे म्हणून नवीन नवीन देवाच्या कल्पना पुढे आणल्या आणी पाप - पुण्याचे भय भोळ्या जनतेला दाखवून, त्या कल्पनाना मूर्त स्वरूप देण्याचा सपाटा चालविला होता. प्रत्येक जाती - जमातीची वेगवेगळ्या देवाची वेगवेगळी देवळे बांधली जाऊ लागली होती आणी त्या देवळात पूजा - अर्चा ब्राह्मणांचे हाताने मोठया प्रमाणावर होऊ लागली होती.


( " भारतीय अस्पृश्याची शौर्य गाथा " या पुस्तकातून सादर.

पृष्ठ. क्रं.143 ते 145.