सोमवार, २२ जुलै, २०२४

पालक आपल्या मुलांवर ओझे असू शकतात. मुले त्यांच्यावर कधीच ओझे नसतात.

 वडिलांचे अचानक आगमन झाल्याने....

 बायकोला राग आल

 “म्हाताऱ्याला पैशाची गरज आहे असं दिसतंय, नाहीतर इथे कोण येणार होतं!  आमच्या पोटाचा खड्डा भरत नाही, तो तुमच्या घरच्यांच्या पोटात भरणार कुठून?

 मी नजर हटवली आणि दुसरीकडे पाहू लागलो.

 नळावर हात तोंड धुवून बाप प्रवासाचा थकवा दूर करत होता.

 यावेळी माझा हात थोडा घट्ट झाला.

 मोठ्या मुलाचा बूट फाटला आहे.  शाळेत जाताना तो रोज कुरकुर करतो.

 पत्नीच्या उपचारासाठी संपूर्ण औषधे खरेदी करता आली नाहीत.

 बाबूजींना ही आता यायचं होतं.

 घरात भयाण शांतता पसरली होती.

 जेवण झाल्यावर वडिलांनी मला त्यांच्या जवळ बसण्याचा इशारा केला.

 मला शंका आली की काहीतरी आर्थिक समस्या आली असावी.

 बाबा उठून खुर्चीवर बसले.

 पूर्णपणे बेफिकीर

 "ऐक 

 म्हणत त्याने माझे लक्ष त्याच्याकडे वळवले.

 श्वास रोखून मी तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो.  रोम-रोमा होऊन पुढचं वाक्य ऐकून मी सावध झालो.

 ते म्हणाले, “शेतीच्या कामात क्षणभरही मोकळा वेळ मिळत नाही.  सध्या कामाचा ताण आहे  रात्रीच्या ट्रेनने परत जाणार.  तीन महिन्यांपासून तुमचे कोणतेही पत्र आलेले नाही.  जेव्हा तुम्ही चिंतेत असता तेव्हा हे करता."

 बाबूजी ने खिशातून शंभरची नोट ची बंडल काढली आणि माझ्यापुढे केली,

 ठेवा.  तुम्हाला उपयोगी पडेल.  भाताचे पीक चांगले आले.

 घरी काही अडचण नाही.

 तू खूप अशक्त दिसत आहेस.  व्यवस्थित खा आणि प्या.  तुझ्या सुनेची पण काळजी घे."

 मला काहीच बोलता येत नव्हते.  शब्द माझ्या घशात अडकले होतें.

 मी काही बोलायच्या आधीच वडिलांनी मला प्रेमाने रागावले.

 "घ्या.  तुम्ही मोठे झाले ना आता?

 "नाहीतर." मी हात पुढे केला. बाबांनी माझ्या तळहातावर नोटा ठेवल्या.

 वर्षापुर्वी माझे वडील मला शाळेत जातांना असे पैसे हातावर देत असत, पण तेव्हा माझे डोळे आजच्यासारखे खाली जात नव्हते.😥😥


 मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की


पालक आपल्या मुलांवर ओझे असू शकतात.

 मुले त्यांच्यावर कधीच ओझे नसतात.,❤️❤️

~अनामिक

कथाविश्व - नाते संबंध दृढ करायला शिकवणारे आपले कथांचे विश्व🎉

gito 7057573102

रविवार, २१ जुलै, २०२४

म्हातारपण येणे

म्हातारपण येणे*

[20/07, 06:49] Rajan  Patwardhan: मला आज वाचनात आलेला उत्तम लेख 

'            *म्हातारपण येणे*            '

*" हा लेख फक्त वयोवृद्ध लोकांसाठीच आहे असे नव्हे, तर सर्वांनी आवर्जून वाचावा असा आहे. म्हातारपण येणे ही एक सत्य स्थिती आहे आणि त्याला आनंदाने सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी आधीपासूनच पावले उचलणे का आवश्यक आहे, काय करायला पाहिजे, हे समजावून सांगणाऱ्या कादंबरीची ही एक संक्षिप्त ओळख. "*  

*"The Sky Gets Dark, Slowly." हळूहळू आभाळ गडद होत चालले आहे, संधिकाल होऊ लागला आहे.*

*'Mao Dun साहित्य पुरस्कार' मिळालेले "श्री Zhou Daxin" यांची नवी कादंबरी “The Sky Gets Dark, Slowly” लवकरच प्रकाशित होत आहे. वृद्धापकाळातील परिस्थितीचा संवेदनशील शोध घेण्याचा हा एक प्रयत्न आहे, तसेच वेगाने वृद्ध होणाऱ्या लोकांमधील लपलेल्या पण व्यक्त न होणाऱ्या जटिल अशा भावना उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कादंबरीत केला आहे.*  
 
त्यात त्यांनी असे म्हंटले आहे की बरेचसे वयोवृद्ध असे वागतात बोलतात की त्यांना जणू काही सगळेच माहित आहे. पण अशा उतार वयात ते लहान मुलांइतकेच अज्ञानी असतात. बऱ्याच वयोवृद्ध लोकांना आपल्यावर काय प्रसंग गुजरणार आहे, किंवा आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे हे माहित नसते व म्हणूनच त्या दृष्टीने त्यांनी काहीच तयारी केलेली नसते. .

*वयाची ६० वर्षे उलटल्यावर  व त्यानंतर हळूहळू वय वाढत जाऊन शेवटचा श्वास घेईपर्यंतच्या काळात अशा वृद्ध व्यक्तींनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक व शारीरिक तयारी होईल व घाबरून जाण्याचे काही कारण सुद्धा राहणार नाही.*

*१.* :-  जस-जसे वय वाढत जाते तस-तसे तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या जवळचे असणारे लोक हळू हळू कमी होतील. तुमच्या आई-वडिलांच्या आणि आजी-आजोबांच्या पिढीतील बऱ्याच जणांनी हे जग सोडले असेल, व समवयस्क असलेल्या तुमच्या आप्तांना व मित्रांना स्वतःकडे बघणे सुद्धा जड जाऊ लागेल. तरुण पिढी त्यांच्या कामात, त्यांच्या जीवनात व्यग्र-व्यस्त असेल. तुमच्या जीवनाचा जोडीदार सुद्धा कदाचित हे जग तुमच्या आधी किंवा तुमच्या अपेक्षेपूर्वीच सोडून गेलेला असेल. आणि यानंतर काय उरते तर एक नको वाटणारा एकटेपणा. अशा एकटेपणाच्या परिस्थितीत कसे जगायचे, एकटेपणाला सामोरे जाऊन उर्वरितजीवनातील आनंद कसा मिळवायचा, हे तुम्ही शिकून घेतले पाहिजे, त्यासाठी मानसिक तयारी केली पाहिजे.    
*२.* :-  उतार वयात समाज तुमच्याकडे क्वचितच लक्ष देईल किंवा तुम्हाला दुर्लक्षित करेल. तुमच्या पूर्वायुष्यात तुम्ही कितीही मोठे पद भूषवले असेल, अथवा समाजातील कितीही प्रसिद्ध व्यक्ती तुम्ही असाल, तरीही निसर्ग नियमाप्रमाणे तुम्हाला वार्धक्य हे येणारच आणि वार्धक्यात तुमच्या आजू-बाजूला घोटाळणारे लोक, तुमची हांजी-हांजी करणारे लोक तुमच्या पासून लांबच राहतील व तुम्हाला एका कोपऱ्यात गप्प उभे राहण्याची वेळ येईल. तुमच्या समोर, तुमच्या आजूबाजूला जे काही चालले आहे त्याचे कुठलाही मत्सर न दाखवता, काहीही तक्रार न करता कौतुक करणे, त्याला पसंती दर्शवणे, हेच अशा उतार वयात तुमच्या हातात आहे.
*३.* :-  वय झाल्यावर आता पुढचा रस्ता अडचणींचा व अडथळ्यांचा आहे. हाडे कमकुवत होणे, हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, मेंदूसंबंधी विविध विकार, कर्करोग व इतर अनेक आजार तुमचे पाहुणे म्हणून तुमच्यासमोर कधीही उभे राहू शकतात व त्यांना तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुमचे आजार, तुमची दुखणी-खुपणी यांना तुमचे मित्र समजा, कारण यांच्याबरोबरच आता तुम्हाला उर्वरित आयुष्य काढायचे आहे. तुम्हाला कुठलाही शारीरिक त्रास होणार नाही अशाभ्रमात राहूनका. पण सकारात्मक मानसिकता ठेवणे, योग्य आहार-विहार करणे हे तुमचे आता कर्तव्य आहे. आणि यात सातत्यठेवण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित ठेवणे तुम्हाला गरजेचे आहे.    

*४.* :-  एखाद्या बालकाप्रमाणे आता आपले आयुष्य बहुतांशी पलंगावरच व्यतीत होणार आहे, ह्याची तयारी ठेवा. आपण मातेच्या गर्भातून ह्या जगात आलो ते प्रथम पलंगावरच. आणि त्यानंतर जीवनातील असंख्य चढ-उतार, हेलकावे, जीवनसंघर्ष वगैरेचा अनुभव घेऊन आपण आपल्या प्रारंभ बिंदूकडे, पलंगाकडे येतो. इतरांना आपली काळजी घ्यावी लागणार ह्या अवस्थेत असा वयस्कर माणूस पुन्हा येऊन पोचतो, फरक एवढाच असतो की बालपणात आपली काळजी घ्यायला आपली आई होती, पण ह्या टप्प्यावर असे कोणी असण्याची शाश्वती नाही. असे कोणी असले तरी ते आपल्या आईसारखी काळजी घेतील अथवा नाही याची शंकाच असते. परिचारिका 'nursing staff' वगैरेंवर अवलंबून राहण्याची वेळ वृद्धापकाळात येऊ शकते, पण त्यांच्या जवळ आईची माया कुठून असणार? चेहऱ्यावर हास्य ठेवून उपकार केल्याच्या भावनेने, कंटाळून, त्या परिचारिका तुमची सेवा करतील. पण अशाही कठीण परिस्थितीमध्ये शांत रहा व न विसरता कृतज्ञता व्यक्त करा.  

*५.* :-  आता जीवनमार्गातील शेवटच्या काळात तुम्हाला त्रास देणारे, तुम्हाला फसवणारे लोक भेटतीलच. त्यातील बहुतेक जणांना माहित असेल की तुम्ही बऱ्यापैकी संपत्ती जमा केली आहे, आणि तुम्ही जमवलेले हे पैसे तुमच्याकडून हिसकावून घ्यायला काय करावे याचाच विचार असे लोक करत असतील. तुम्हाला खोटे फोन करतील, टेक्स्ट मेसेजेस पाठवतील, ई-मेल करतील. तुम्हाला विविध अन्नपदार्थ किंवा वस्तूंची प्रलोभने दाखवतील, 'लवकर श्रीमंत व्हा' यासारख्या योजना तुमच्या समोर ठेवून तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करतील, दीर्घायुष्यासाठी काही नवीन उत्पादने घेण्यासाठी तुम्हाला भाग पाडतील, वगैरे वगैरे. थोडक्यात म्हणजे तुमच्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी अशी लोकं कुठल्याही थराला जातील. म्हणूनच सावध राहा, काळजी घ्या,आपल्या संपत्तीला कोणालाही हात लावू देऊ नका. शहाणपणाने वागला नाहीत तर तुमचे पैसे तुमच्यापासून दूर जायला वेळ लागणार नाही, म्हणून ह्या वयात काटकसरीने व हुशारीने पैशाचे व्यवहार करा.

शेवटची घटिका येण्यापूर्वी, आयुष्यातील संधीकालात, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर सर्वकाही अंधारून आल्यासारखे वाटेल, आणि ते साहजिकच आहे. पुढील मार्ग दिसणे कठीण होऊन जाईल व त्यामुळे पुढील वाटचाल सुद्धा सोपी असणार नाही. आणि म्हणूनच, *एकदा का वयाची ६० वर्षे पार झाली की मग आयुष्य जसे आहे तसे बघण्याचा प्रयत्न करा, आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घ्या, शक्य असेल तोपर्यंत आयुष्याची मजा अनुभवा. समाजातील कुठलेही ओझे अंगावर घेऊ नका. मुलांमध्ये नातवंडामध्ये अडकून राहू नका. वागणूक साधी व नम्र ठेवा, आपण वयाने मोठे आहोत म्हणून आपण फार शहाणे आहोत असे समजू नका* व तसे इतरांना दाखवू पण नका. *उद्धटपणे इतरांशी बोलू नका कारण त्याचा त्रास इतरांना होईलच, पण तुम्हाला त्याचा त्रास जास्त होईल.* आपले वय जस-जसे वाढत जाते तस-तसे आदर म्हणजे काय व त्याचे महत्व समजून घेणे अत्यावश्यक आहे. *कुठल्याही वस्तूची किंवा व्यक्तीची आसक्ती न ठेवणे किती गरजेचे आहे हे लक्षात घेणे अशा उतार वयात आवश्यक आहे व तशीच आपली मानसिकता ठेवणे गरजेचे आहे.* निसर्गाचा मार्ग म्हणजेच जगण्याचा मार्ग. त्याच प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करीत , जीवनातील शेवटच्या टप्प्यावरील आपले मार्गक्रमण संतुलित करा.    
 
आपण सर्वांनी वाचावे असेच हे पुस्तक आहे, खूप छान, खूप सुंदर

आत्ताच दिवस सुरु झाला ... आणि बघता बघता संध्याकाळचे ६ वाजले.
काल सोमवार होता असे वाटत होते ... आणि आज शुक्रवार आला सुद्धा.  

*... महिना संपत आला,*
*... वर्ष संपायला आले,*
*...आणि वयाची ५०, ६०, ७० वर्षे केव्हां निघून गेली हे कळलेच नाही*
*..आपले आई-वडील,आपले आप्तस्वकीय, मित्र वगैरे हे जग सोडून गेले आणि मग समजेना की आता मागे कसे फिरायचे?*  

चला तर मग, जो काही वेळ आता आपल्याकडे उरला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घेऊ.
*आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचे नाही ...*
*आपल्या आयुष्यात रंग भरुया ...* 
*छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेऊया ...*  
*हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करूया ...*  

उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे
तरमग कुठलीही कृती पुढे ढकलू नका
*... हे नंतर करेन*
*... हे नंतर सांगीन*
*... यावर नंतर विचार करेन*  
'नंतर' आपल्या हातात आहे असे समजूनच आपण पुढे ढकलतो ना सगळे .....
कारण, आपण हे समजून घेत नाही की
चहा थंड झाल्यानंतर ...
प्राधान्य बदलल्यानंतर ...
उत्साह निघून गेल्यानंतर...
आरोग्य बिघडल्यानंतर ...
मुले वयात आल्यानंतर ...
आई-वडील म्हातारे झाल्यानंतर ...  
आश्वासन न पाळल्यानंतर...
दिवसाची रात्र झाल्यानंतर ...
आयुष्य संपल्यानंतर ...
आणि ह्या सगळ्या 'नंतर'  आपल्याला कळते अरे बापरे... उशीर झाला की ...  

*"आणि म्हणूनच 'नंतर' काही ठेवू  नका. 'नंतर' ने 'अंतर' वाढते व चांगल्या गोष्टी,*     *चांगले क्षण हातातून निसटून जातात उदाहरणार्थ...उत्तम अनुभव, उत्तम मित्रमंडळी, उत्तम कुटुंब"*

*दिवस आजचा ... आणि क्षण आत्ताचा ...*  

*आजची गोष्ट उद्यावर ढकलणे आपल्याला झेपणारे नाही, कारण आता आपले वय उतरणीस लागलेय.*

तर बघूया की वेळ न दवडता हा संदेश इतर लोकांपर्यंत कोण कोण पोचवत आहे? कारण, *हा संदेश नंतर पाठवीन असा कोणी विचार केला तर ... तर कदाचित  पुढे कधीच पाठविला जाणार नाही.*

*जे वयस्कर नाहीत त्यांच्या पर्यंत सुद्धा हा संदेश पोहोचावा.*

*सर्वजण आरोग्य संपन्न व आनंदी राहोत हीच सदिच्छा.*  
               😔🙏😌

=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=--=-
कुठेतरी छानसे वाचलेले..

चांगले म्हणुन काॅपी पेस्ट केले..
[20/07, 06:51] Rajan  Patwardhan: आभार श्री शरदचंद्र रिसवाडकर ,कांदिवलीपश्र्चिम ,ब्लू एरिया !

मंगळवार, २ जुलै, २०२४

शरीर मृत होण्या आधीच आलिंगन द्या आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू

 शरीर मृत होण्या आधीच आलिंगन द्या

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू 




डोक्यात राग भरल्यावर 

फुटणार कसं हसू ?

अहंकार बाळगू नका 

भेटा बसा बोला 

मेल्यावर रडण्यापेक्षा

जिवंतपणी बोला 

नातं आपलं कोणतं आहे

महत्वाचे नाही

प्रश्न आहे कधीतरी

गोड बोलतो का नाही ?

चुका शोधत बसाल तर

सुख मिळणार नाही 

चूक काय बरोबर काय

कधीच कळणार नाही 

काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू .....ll 1 ll

चल निघ चालता हो

इथे थांबू नको

हात जोडून विनंती आहे

अशी भाषा नको

दारात पाय नको ठेऊ 

तोंड नाही पहाणार 

खरं सांगा असं वागून 

कोण सुखी होणार ?

तू तिकडे आम्ही इकडे

म्हणणं सोपं असतं

पोखरलेलं मन कधीच 

सुखी होत नसतं

सुखाचा अभास म्हणजे 

खरं सुख नाही 

आपलं माणूस आपलं नसणे

दुसरं दुःख नाही 

करमत नाही घरी म्हणून गाळू नका आसु

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू ....ll 2 ll

एकतर्फी प्रेम करून

उपयोग आहे का ?

समोरच्याला आपली आठवण

कधी तरी येते का ?

नातं टिकलं पाहिजे असं

दोघांनाही वाटावं

कधी गायीने कधी वासराने 

एकमेकाला चाटावं

तुमची काहीच चूक नाही 

असं कसं असेल 

पारा शांत झाल्यावरच 

सत्य काय ते दिसेल 

बघा जरा एकांतात

डोळे मिटून आत

चूक कबूल करतांना

जोडताल दोन्ही हात

अंधारात अश्रू ढाळत खरंच नका बसू

आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू .....ll 3 ll

दुसऱ्याला दोष देणं

खूप सोपं असतं

वेळ आल्यावर कळतं की

कुणी कुणाचं नसतं

भेटत नाहीत बोलत नाहीत

गुन्हा तरी काय ?

जे वाटतं ते बोलून

रड धाय धाय

शक्य आहे ताण जाऊन

वाटेल हलकं हलकं

गुळणी धरून बसू नका

व्हा थोडं बोलकं

कोण चूक कोण बरोबर

हिशोब करून टाका

प्रत्येक क्षण जगून घ्या

घालवू नका मोका

त्याच त्याच गोष्टींचे पत्ते नका पिसू

आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू ....ll 4 ll

आपली मतं दुसऱ्यावर

मुळीच लादू नका

समोरच्या व्यक्तीचा

अंत बघू नका

कोणताही विषय असो

जास्त नका ताणू

मीच शहाणा बाकी मूर्ख

असे नका मानू

कोण म्हणतं गोड बोलून

प्रश्न सुटत नाही

अनेकदा समजूतदार

माणूस भेटत नाही

जिभेवर साखर ठेवा

होणार नाही वाद

आवडल्यावर मनातून

द्या की हो दाद

तडतड बोलून उगीच मनं नका नासु

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू ....ll 5 ll

बचतच कामी येते

खर्च कमी कर

जरी मोठा झालास तरी

रहा जमिनीवर

विचार करून पाऊल टाका , कुठे नका फसू

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू ....ll 6 ll

ठीक आहे चूक नाही 

तरीही जुळतं घ्या 

बॉडी डेड होण्या आधीच 

आलिंगन द्या

स्मशानभूमीत चांगलं बोलून

काय उपयोग आहे 

जिवंतपणी कसे वागलात

जास्त महत्वाचं आहे

माझ्या कवितेत कोणतंही

तत्वज्ञान नाही 

तुम्ही खुशाल म्हणू शकता

कवीला भान नाही

ठीक आहे तुमचा आरोप

मान्य आहे मला

माझं म्हणणं एवढंच आहे

वाद नको बोला 

काय माहीत उद्या

आपण असू किंवा नसू

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू ll 7 ll


GITO 7057573102

रविवार, ३० जून, २०२४

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स .. तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर ..*

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स .. तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर ..* 

*आर्टिफिशिअल इंटेलिजन्स .. तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर ..* 
*- अच्युत गोडबोले*

*आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता काय करू शकते, ह्याची चुणुक जगाला दिसू लागली आहे ..!!* 

*ह्या तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ म्हणवले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन ह्यांनी त्याविषयीची भीती व्यक्त केली आहे. ‘एआय’ काय आहे, ते विनाशक का होऊ शकते याविषयी ..* 

👇 

*"कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (एआय) मी जे काम केले, त्याबद्दल मला थोडा खेदच वाटतो" हे उद्गार आहेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ असे बिरूद लाभलेले डॉ. जेफ्री हिंटन ह्यांचे ..!!* 

*गुगल मधून राजीनामा देताना, 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’, आणि त्या तंत्राच्या भयावह शक्यता ह्या विषयी बोलताना नोकरीमध्ये असताना मर्यादा येतील, म्हणून राजीनामा देत आहे ..!!"* 

*मी ह्याला ‘तिसरा स्फोट’ म्हणतो ..!!* 

*सन १८९६च्या आसपास ‘डायनामाइट’चा शोध लावणाऱ्या आल्फ्रेड नोबेलचा स्फोट पहिला ..!!*  

*सन १९४५ मध्ये ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’मधील अणुबॉम्बचा शोध लावणारा ओपेनहाइमरचा स्फोट दुसरा ..!!* 

*आल्फ्रेड नोबेलच्या भावाचे निधन झाल्यानंतर, आल्फ्रेडचेच निधन झाले आहे असे समजून एका वृत्तपत्राने,  ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याचे निधन’ अशी बातमी छापली ..!!* 

*आपण मेल्यावर जग आपल्याला कसे ओळखेल, आठवेल ह्या विषयीची ‘याची देही, याची डोळा’ जाणीव झाल्यानंतर उपरती झालेल्या आल्फ्रेडने, पाप-क्षालनासाठी ‘नोबेल पारितोषिका’ची घोषणा केली ..!!* 

*गंमत म्हणजे ह्याच नोबेल पारितोषिकासाठी १९४६, १९५१, १९६७ असे तीन वेळा नामांकन मिळालेल्या; परंतु पुरस्कार मिळू न शकलेल्या रॉबर्ट ओपेनहाइमरने अणुबॉम्ब बनवला. त्याचा स्फोट ‘डायनामाइट’पेक्षा कित्येक पट विध्वंसक होता. त्यानंतर त्या संशोधनाच्या विनाशक शक्तीमुळे, ओपेनहाइमरने खेद व्यक्त केला होता ..!!* 

*आताचा डॉ. जेफ्री हिंटन ह्यांचा राजीनामा आणि त्यानंतरची 'खेदयुक्त काळजी' हा ‘एआय’ तंत्राच्या अजूनही अव्यक्त; पण नजीकच्या भविष्यातील महास्फोटाची जणू नांदीच ..!!* 

*इतकी वर्षे ‘गूगल’मध्ये कार्यरत असूनही, त्याने आत्ताच राजीनामा देण्याची मला तीन कारणे वाटतात. पहिले म्हणजे ..* 

*‘एआय’मुळे नजिकच्या काळात जवळजवळ ६० ते ८० टक्के नोकऱ्या कमी होण्याचे भाकित वर्तविले जात आहे ..!! त्यामुळे प्रचंड सामाजिक अस्थैर्य निर्माण होईल ..!!* 

*दुसरे म्हणजे, अलीकडेच ‘चॅट जीपीटी’ आणि ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’ने (एलएलएम) घातलेला धुमाकूळ ..!!*  

*आणि ..* 

*तिसरे म्हणजे, ह्या अत्यंत प्रगत ‘एआय’मुळे तयार होत असलेल्या विध्वंसक शस्त्रांची भीती ..!!* 

*‘स्वार्म तंत्रज्ञान’, म्हणजे अनेक छोटे ड्रोन एकत्रित काम करतात ..!! एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र दिल्यास, हे सारे छोटे ड्रोन एकत्र काम करून त्या व्यक्तीला ठार करू शकतात ..!! ह्या हल्ल्यातून बचाव होणे शक्य नाही ..!!* 

*ही तिन्ही कारणे ज्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाली त्यात, डॉ. हिंटन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे ..!!* 

*‘चॅट जीपीटी’ आणि ‘डीप फेक’ तंत्रज्ञानासारख्या गोष्टींमुळे, सोशल मीडियावर बनावट छायाचित्रे, व्हिडिओ, मजकूर यांचा अनिर्बंध सुळसुळाट होण्याची नुसती शक्यताच नव्हे, तर अनेक शास्त्रज्ञांना खात्री वाटते ..!! हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वाईट हेतू असणाऱ्या, आसुरी महत्त्वाकांक्षेने प्रेरीत लोकांच्या हाती पडल्यास, जगाचा विनाश अटळ आहे, याबाबतही त्यांच्यात एकवाक्यता आहे ..!!* 

*याच्याही पुढे जात ..* 

*'जगाचा विनाश होईल का ..??*  

*ह्यापेक्षा ..* 

*‘कधी होईल' ..??’* 

*एव्हढेच विचारणे आपल्या हातात आहे, अशी भीतीही अनेक विचारवंत व्यक्त करीत आहेत ..!!* 

*ह्याच प्रकारची विधाने, काळजीयुक्त भाषणे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि प्रसिद्ध तंत्रज्ञ-उद्योजक इलॉन मस्क, बिल गेट्स करीत आहेत ..!! आपण ती ऐकत आणि वाचत आहोत ..!!* 

*व्हाइट हाउसने नुकतेच ‘गूगल’चे सुंदर पिचाई आणि ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला  ह्यांना ‘एआय’चा जबाबदारीपूर्वक वापर करणे आणि त्यासाठीचा आराखडा करणे, ह्यासंबंधी बोलावले होते. त्या बैठकीत ‘ओपन एआय’च्या (‘चॅट जीपीटी’ची जनक कंपनी) सॅम आल्टमनबरोबरच अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिसही उपस्थित होत्या. ‘विश्वासार्ह एआय’साठी व्हाइट हाउसने १४ कोटी डॉलर जाहीर केले आहेत ..!!* 

*‘एआय’ची उपशाखा असणारी ‘न्यूरल नेटवर्क’ खूप जुनी आहे. ‘न्यूरल नेटवर्क’ अती-प्रगत करण्यात, तिचे २०१२मध्ये ‘डीप लर्निंग’मध्ये रूपांतर करण्यात, डॉ. हिंटन ह्यांचे मोलाचे योगदान आहे. ह्या ‘डीप लर्निंग’ प्रकारामुळे आज ही परिस्थिती ओढावली आहे ..!!*  

*डॉ. हिंटन म्हणतात की, हे तंत्रज्ञान मानवापेक्षाही पुढे जाईल, अशी शक्यता आहे आणि ती खूप भयावह आहे ..!!* 

*काही दिवसांपूर्वी ‘सॅमसंग’ कंपनीने ‘चॅट जीपीटी’च्या वापरावर बंदी घातली ..!!* 

*वॉरन बफे या गुंतवणूक क्षेत्रातील अग्रेसर सीईओने तर ‘एआय’ला ‘दुसरा अणुबॉम्ब’ म्हटले आहे ..!!* 

*‘एआय’ तंत्रज्ञानामुळे ६० ते ८० टक्के लोकांच्या हातचे काम जाईल, ते बेरोजगार होतील, ह्याच्या अनेक पाऊलखुणा दिसत आहेत ..!!* 

*‘रायटर्स गिल्ड’ या अमेरिकेतील लेखकांच्या संघटनेने नुकत्याच काढलेल्या मोर्चाने हे दाखवून दिले. ‘चॅट जीपीटी’ कथा, पटकथा लिहून देणार असेल, तर ह्या लेखकांना कोण मानधन देणार ..??* 

*परवाचीच बातमी आहे, की ब्रिटनमध्ये गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्यापेक्षा ‘चॅट जीपीटी’ने गुंतवणुकीवर अधिक परतावा दिला ..!!* 

*‘सोनी’च्या छायाचित्र स्पर्धेत प्रथम पारितोषिक जाहीर झालेल्या जर्मन छायाचित्रकाराने ते नम्रपणे नाकारले; कारण ती ‘एआय’ची कलाकृती होती ..!!* 

*‘एआय’, ‘बिग डेटा’, ‘क्लाउड’ इत्यादींचा समुच्चय असणारी, २०१३मध्ये अस्तित्वात आलेली चौथी औद्योगिक क्रांती म्हणजेच ‘इंडस्ट्री ४.०’ किंवा ‘आय ४’ ..!!* 

*ह्याला मागे टाकत, दहा वर्षांत ‘इंडस्ट्री ५.०’ उदयाला आली आहे. ह्यामध्ये मानव आणि यंत्र-तंत्र-रोबो एकत्र काम करतील. याला ‘कोबॉट’ म्हणतात. ‘कोबॉट’मुळे जीवन सुखावह (की आळशी ..??) झाले, तरी असंख्य नोकऱ्यांवर गदा येऊन, सामाजिक अस्थैर्य वाढेल ..!!* 

*प्रख्यात मानववंश शास्त्रज्ञ युवल हरारी (‘सेपियन्स’चा लेखक) ह्याने एका ‘टेड टॉक’मध्ये म्हटले आहे की, ९० टक्के लोकांना भविष्यात काही कामच नसेल ..!!* 

*यावर काहीसा उपाय म्हणून बिल गेट्स यांनी ‘एआय एथिक्स ग्रुप’ सुचवला आहे ..!! त्यांनी असेही म्हटले आहे की, एखाद्या उद्योगाने लोकांना काढून रोबोंना काम दिले तर, त्यांना ‘रोबो कर’ लावण्यात यावा ..!!* 

*‘एआय’वरील संशोधन सहा महिने थांबवावे, असे अनेक तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंत सुचवत आहेत ..!! तंत्रज्ञानाने केलेली कलाकृती वा काम,  आणि मानवाने केलेले काम,  ह्यांत फरक करता आला नाही तर, त्याला ‘ट्युरिंग टेस्ट’ म्हणतात ..!!* 

*‘कोबॉट’ या ‘इंडस्ट्री ५.०’मधील तंत्रज्ञानात आपण तेथपर्यंत पोहोचलो आहोत. डॉ. जेफ्री हिंटन हे ‘ट्युरिंग पुरस्कार’ विजेते आहेत ..!!* 

*एवढे सामाजिक अस्थैर्य, विध्वंस होणार असेल तर,  ‘एआय’ करायचेच कशाला, असा प्रश्न मनात उद्भवू शकतो ..!! शेवटी ती मानवाचीच निर्मिती आहे, आणि त्याचे उत्तर दडले आहे लोभीपणात ..!!* 

*‘एआय’मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना, त्यांच्या भागधारकांना उत्तम परतावा देऊन, स्वत:ची तुंबडी भरायची आहे. जगात अस्थैर्य निर्माण होईल वगैरे तात्त्विक गोष्टींत त्यांना रस नसून, त्यांच्यात ‘एआय’मधील अग्रणी होण्याची उघडी-नागडी स्पर्धा आहे, हे नि:संशय ..!!* 

*या स्पर्धेत आपण टिकून राहण्यासाठी शिक्षण-पद्धतीत शिक्षकांनी ‘गूगल’ व्हावे आणि विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’ ..!!  म्हणजेच शिक्षकांनी ‘गूगल’पलीकडचे ज्ञान द्यावे आणि, विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’चा वापर करावा; पण त्यावर पूर्ण अवलंबून न राहता स्वत:चा तरतम भाव वापरावा ..!!* 

*ह्या पुढे आपली स्पर्धा ‘एआय’शी असणार आहेच; त्याहीपेक्षा ती ‘एआय’बरोबर काम करणाऱ्या मानवांशी अधिक असेल ..!!* 

🙏🙏https://whatsapp.com/channel/0029Va6C2CgLdQeZKIu1kn1L

*- अच्युत गोडबोले*

जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?

 


जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?

वाचन तुम्हाला जगातून बाहेर काढते; जेव्हा तुम्ही स्वतःला तुमच्या कामाच्या वातावरणातून काढून टाकता, तेव्हा तुम्हाला अशा गोष्टी दिसू लागतील ज्या तुम्हाला खरोखर करायच्या असतील ज्या तुम्ही अद्याप करत नाही. "वाचनामुळे तुमच्या मनाला भटकण्याची संधी मिळते." निरोगी वाचनाने तुमचे मन निरोगी राहते.

१) भिकाऱ्यात पण माणुस दिसायला लागतो.


२) चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते.


३) प्रेम आणि वासना यातला फरक कळायला लागतो.


४) एखाद्याची चुक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते.


५) कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलु नये हे कळते.


६) चाकु, बंदुक यांच्यापेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते.


७) आई वडीलांची किंमत कळायला लागते.


८) ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण…. या गोष्टी म्हणजे पुर्ण जीवन संपले हा गैरसमज दुर होतो. 


९) या गोष्टी पण इतर गोष्टी सारख्याच सामान्य वाटायला लागतात.


१०) प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते.


११) सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते.


१२) कलाकार चित्रपटात नाटक/काम करतात. खऱ्या आयुष्यात पण खुप नाटकं करणारी कलाकार आपल्या जवळ असतात हे पण समजते.


१३) या जगात १% चागली लोक आहेत आणि १% वाईट लोक आहेत.राहीलेले आपण सर्व फक्त अनुयायी आहोत, काहीजण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होतात तर काहीजण वाईट लोकांचे अनुकरण करून वाईट होतात, 

हे पण समजते.


१४) प्रोत्साहनामुळे हरलेला व्यक्ति जिंकु शकतो, हे समजायला लागते.


१५) हारल्यावर किंवा नापास झाल्यावर आत्महत्येचा विचार पण मनात येत नाही.


१६) करोडोची संपत्ती असणाऱ्या मध्ये गरिब तसेच दिवसाचे २००/- कमवणाऱ्यामध्ये श्रीमंत दिसायला लागतो...

gito 7057573102

सोमवार, १७ जून, २०२४

टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडररला Dartmouth Collegeनं सन्माननीय डॉक्टरेट दिल्यानंतर त्यानं केलेलं भाषण प्रचंड गाजतं आहे

 टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडररला Dartmouth Collegeनं सन्माननीय डॉक्टरेट दिल्यानंतर त्यानं केलेलं भाषण प्रचंड गाजतं आहे.. फेडररचं भाषण प्रेरणादायी होतंच. पण उत्कृष्ट भाषण कसं असावं याचा नमुना म्हणून ते इतिहासात अजरामर ठरेल याचं कारण म्हणजे प्रत्येक माणसासाठी ते उपयोगी आहे.



आपल्या सुमारे २५ मिनिटांच्या भाषणात त्यानं आजच्या भाषेत बोलायचं तर “तीन टेकअवेज” सांगितले आहेत. 


१.


Effortless is a myth 


एफर्टलेस - एखादी गोष्ट लीलया करणं, ती सहजगत्या अवगत असणं ही केवळ दंतकथा आहे. केवळ एखाद्याकडे टॅलेंट आहे म्हणून त्याला / तिला ते जमतं असं कधीच नसतं. अनेक वर्षांचे परिश्रम त्यामागे असतात. लोक म्हणतात मी लीलया खेळतो. त्यांना माझं कौतुकच करायचं असतं. मात्र “तो किती सहजगत्या खेळतो” हे सारखं ऐकून मी वैतागायचो. खरं तर मला प्रचंड मेहनत करावी लागत होती. मी अनेक वर्षं रडगाणं गायलो, चिडचिड केली, रागानं रॅकेट फेकून दिली आणि मग मी शांत रहायला शिकलो. मी इथपर्यंत केवळ टॅलेंटवर पोचलेलो नाही. माझ्या प्रतिस्पर्ध्यांच्या खेळापेक्षा चांगला खेळ करण्याचा अविरत प्रयत्न करुन मी इथवर पोचलो.


२.


It's only a point


आपण खेळलेल्या १५२६ सिंगल मॅचेसपैकी फेडरर ८० टक्के मॅचेस जिंकला. मात्र पॉईंटस ५४ टक्केच जिंकला.. म्हणजे सर्वोच्च स्थानावरचे टेनिस खेळाडूदेखील निम्मे पॉईंटस गमावतात.. तेव्हा तुम्ही It's only a point असा विचार करायला स्वत:ला शिकवायला हवं. आयुष्याच्या खेळात सतत आपण असे पॉईंटस गमावत असतो. मात्र तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला नकारात्मक गोष्टींवर मात करायला शिकवतो. आत्मविश्वास त्यातूनच वाढतो. तळमळीनं, स्पष्टपणे आणि लक्ष केंद्रित करुन पुढचा गेम खेळायला तुम्ही तयार होता.


उत्तमोत्तम खेळाडू हे त्या स्थानापर्यंत प्रत्येक पॉईंट जिंकल्यानं पोचत नाहीत, तर आपण वारंवार हरणार आहोत आणि त्यावर कशी मात करायची ते सातत्यानं शिकत रहातात म्हणून उत्कृष्टतेपर्यंत पोचतात.

GITO 7057573102 जिटो सत्फुल सोनवणे COMPUTER PLANET कॉम्प्युटर प्लॅनेट ·

३.


‘Life is bigger than the court’


आयुष्य हे टेनिस कोर्टपेक्षा फार मोठं आहे. मी खूप परिश्रम घेतले, खूप शिकलो आणि टेनिस कोर्टाच्या त्या छोट्या मैदानात कित्येक मैल पळलो. मात्र मी पहिल्या पाचांमध्ये असतानाही मला आयुष्य जगण्याचं महत्व कळत होतं. प्रवास, निरनिराळ्या संस्कृतींचा अनुभव, नातीगोती आणि विशेषत:, माझं कुटुंब. मी माझी मुळं कधी सोडली नाहीत, मी कुठून आलो ते मी कधीच विसरलो नाही.


टेनिसप्रमाणेच तुम्ही तुमच्या आयुष्यात एका बाजूला उभे असता. तुमचं यश तुमच्या प्रशिक्षकावर, तुमच्या टीममधल्या सहका-यांवर, तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर अवलंबून असतं. तुम्ही घडता ते या टीमवर्कमुळे..! 



शुक्रवार, ३१ मे, २०२४

एखादं बाळ रडत असेल तर त्याला शांत करण्यासाठी Nanni AI हे अँप.




एखादं बाळ रडत असेल तर त्याला शांत करण्यासाठी पालकांना रात्र रात्र जागावं लागतं. पण त्याहून कठीण असतं: हे समजून घेणं की बाळ नेमकं का रडतंय? पालकांना असं वाटतं की जणू एखादं परदेशी भाषेचं शब्दकोशाशिवाय भाषांतर करण्याचा प्रयत्न करतोय. 


चार्ल्स ओनू या मशीन लर्निंग एक्स्पर्ट ने AI च्या मदतीने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तयार झालं Nanni AI हे अँप.


नायजेरियामध्ये बाळांच्या रडण्याचा अभ्यास करत असताना, ओनू यांनी एक कल्पना मांडली: बाळाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रडण्याचे वेगवेगळे अर्थ असतील का? उदाहरणार्थ, "मला भूक लागली आहे" असं रडणं हे "मला शी आलीये" असं रडण्यापेक्षा वेगळं असेल. हे सिद्ध करण्यासाठी, त्यांनी जगभरातील हॉस्पिटलमधून शक्य तितक्या बाळांच्या रडण्याचे आवाज रेकॉर्ड करायचे ठरवले.


आत्तापर्यंत त्यांनी हजारो रेकॉर्डिंग्स जमा केले आहेत, ज्यासोबत प्रत्येक बाळाच्या अस्वस्थतेचे कारण देखील जमा केले आहे. पुढे, ओनू आणि त्यांच्या सहकाऱ्याने त्या डेटाला एक AI मॉडेलमध्ये फीड केले. परिणामी: पालकांसाठी Nanni AI नावाचे एक अ‍ॅप तयार झाले जे बाळाला अस्वस्थ करणारे नेमके कारण ओळखण्यात मदत करू शकते.


हे अँप कसे काम करते ? 


पालक काही सेकंदांसाठी त्यांच्या बाळाच्या रडण्याचा आवाज रेकॉर्ड करून अ‍ॅपला ऑडिओ विश्लेषण करण्यास सांगू शकतात. Nanni AI त्यानंतर बाळाला शांत करण्यासाठी काही सल्ले देईल. त्यापैकी एक बाळाच्या रडण्याचे कारण असू शकते.

सत्फुल प्रल्हाद सोनवणे
GITO जिटो

मिशन खरा न्याय भक्कम पुराव्यासह

एका वर्षात दहा हजार लोकांना त्यांचा खरा न्याय मिळवून देणे विथ स्ट्रॉंग इव्हिडन्स द्वारे हा माझा ध्यास आहे
Website social media & Product Photo , व्हिडिओ information :- https://linktr.ee/Satful
mission true justice with strong evidence
Mission to help 10000 people get true justice are right with strong evidence https://satful.blogspot.com/


आत्तापर्यंत 150,000 पेक्षा जास्त वेळा डाऊनलोड केल्या गेलेल्या या अँपमधील, अल्गोरिदम दिवसेंदिवस अधिक अचूक होत आहे कारण अधिकाधिक पालक त्यांचे रेकॉर्डिंग मॉडेलमध्ये फीड करत आहेत.


Nanni AI इथेच थांबणार नाहीये ?


ओनू यांच्या मते बाळाच्या आदर्श झोपेच्या पद्धतींबद्दल (Sleep Patterns), तसेच काही आरोग्य समस्यांवर देखील Nanni AI सल्ला देऊ शकेल. काही न्यूरोलॉजिकल समस्यांचे रडण्याच्या आवाजातून शोध घेता येतात. ही तर केवळ सुरुवात आहे. यापुढे बाळाच्या रडण्याचा आवाज हा त्यांच्या हृदयाचा दर, रक्तदाब, किंवा तापमानासारखा एक महत्त्वाचा जीवनसूचक ठरेल आणि बालसंगोपन सुधारण्यासाठी महत्वाचे ठरेल," असे त्यांचे म्हणणे आहे.


फोनमधील अँप स्टोअरमध्ये NANNI AI नावाचे अँप उपलब्ध आहे. तुम्ही नवजात बाळाचे पालक असाल तर नक्की पहा. किंवा आपल्या इतर पालक मित्रांना ही पोस्ट पाठवा.



रविवार, २६ मे, २०२४

पाळीव प्राणी आणि त्यांची देखभाल एका वेगळ्याच लेव्हलवर पोचली आहे. पाळीव प्राण्यांनी घरातील सदस्यांचीच जागा घेतली आहे.

 


ज्यांच्याकडे पैसे खर्च करण्याची क्षमता आहे अशा लोकांसाठी पाळीव प्राणी आणि त्यांची देखभाल एका वेगळ्याच लेव्हलवर पोचली आहे. पाळीव प्राण्यांनी घरातील सदस्यांचीच जागा घेतली आहे.


या बदलत्या ट्रेंड्सवर लक्ष ठेवून असणारे जगभरातील अनेक स्टार्टअप्स काही इंटरेस्टिंग pet care ideas वर काम करत आहेत.


BarkAir हे त्यातील प्रमुख उदाहरण. पाळीव प्राणी पालकांना विशेषतः श्वानपालकाना विमान प्रवास करणे खूपच अवघड ठरते. 


या एका दुर्लक्षित पण बऱ्यापैकी मोठ्या मार्केटवर नजर ठेवून BarkAir ही विमानसेवा न्यूयॉर्क मध्ये सुरू झाली आहे. तिकीट बुक झाल्यानंतर लगेचच प्रवासी श्वानबद्दल माहिती घेतली जाते, आवडीनिवडी जाणून घेतल्या जातात. प्रत्येक कुत्र्याच्या शरीर रचनेनुसार त्याच्यासाठी विशिष्ट सीट राखून ठेवली जाते.


विमानातील अंतर्गत रचना खास पाळीव प्राण्यांसाठी डिझाईन केली गेली आहे. विमानात कुत्र्यांना आवडतील असे व्हिडिओ, म्युझिक असते. अधून मधून पाठीवर पोटावर हात फिरवण्यासाठी केअर टेकर असतात…कुत्र्यांना चघळण्यासाठी खास बूट किंवा खेळणी असतात. 


असा सगळा “luxury” थाट असतो. अनेक श्वानपालकांनी BarkAir च्या सेवेचा आनंद घेतला आहे. 


दुसऱ्या एका स्टार्टअप ने ऑरो नावाचा pet robot बनवला आहे. घरातील सर्व माणसं बाहेर गेलेली असताना बिचारा कुत्र्याला एकट्याला किती बोअर होतं याची ज्या शहानपारकांना काळजी असते त्यांच्यासाठी हा उपाय आहे!


ऑरो हा रोबोट कुत्र्याचा सोबती म्हणून काम करतो. घरभर फिरतो, कुत्र्यासमोर एखादा बॉल किंवा खेळणं टाकून ते आणण्याचा खेळ खेळतो. सगळ्यात भारी म्हणजे ऑरो आपल्या स्क्रीनवर कुत्र्याला त्याच्या मालकाचा फोटो पण मधून मधून दाखवतो. आणि मालकाला देखील त्याच्या कुत्र्याचा live व्हिडिओ दाखवतो.


तिसरं स्टार्टअप आहे *Minitailz . जसं* माणसांसाठी स्मार्ट  असतं तसा हा प्राण्यांसाठीचा बँड आहे (कॉलर बँड). तो प्राण्याच्या हृदयाचे ठोके मोजतो. इतर ऍक्टिव्हिटी मोजतो. GPS ट्रॅकर असल्याने आपला प्रिय प्राणी कुठे आहे ते ट्रॅक करता येते. आणि विशिष्ट अंतराच्या बाहेर गेला तर SMS द्वारे पालकाला कळविण्याची पण यात सोय आहे.


२०२४ साल आहे हे….माणसंच नव्हे तर प्राणीही Hi Tech होत आहेत. 


पण खरी मजा तर पुढे आहे. इंस्टाग्राम वर चलतीत असलेल्या एका hashtag ची ! #barkitecture (बर्किटेक्चर) म्हणजे खास पाळीव प्राण्यांना सामावून घेणारे आर्किटेक्चर आणि इंटिरिअर डिझाईन !


आपल्या सोबत राहणाऱ्या प्राण्याला ते घर त्याचेही आहे (!) असे वाटावे म्हणून प्राणिपालक आपल्या घराला नव्याने रूपांतरित करत आहेत. उदा. कुत्र्यासाठीचा बेडरूम , खास कुत्र्यांसाठी डिझाईन केलेलं वेगळे बाथरूम , अगदी माणसांच्या डायनिंग टेबल खालीच कुत्र्याची जेवणाची केलेली सोय..म्हणजे संपूर्ण कुटुंबाला एकत्र जेवता येईल !


इंस्टाग्रामवर #barkitecture हा हॅशटॅग एकदा नक्की शोधून बघा !


लॉक डाऊन नंतर घरी प्राणी पाळण्याच्या संख्येत कमालीची वाढ झाली. माणसांचा या आपल्या शेपटीवाल्या मित्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत गेला. आणि त्यातूनच हे नवे मार्केट तयार  झाले आहे.


मंडळी, कदाचित तुम्हाला या गोष्टी “जरा जास्तच” आहेत असं वाटत असेल. पण कोणतेही नवीन ट्रेंड सुरुवातीला असेच असते. हळूहळू लोक नव्या गोष्टी स्वीकारायला लागतात…आणि बघता बघता त्या “गरजेच्या” होऊन जातात.


आसपास सजगपणे बघा….एखाडी चांगली बिझनेस आयडीया "चार पायांवर" चालताना कदाचित तुम्हालाही दिसेल ! तशी ती तुम्हाला दिसली आणि त्यावर काम केलंत तरच हा लेखनप्रपंच सफल होईल !


सत्फुल प्रल्हाद सोनवणे 

GITO जिटो 


मिशन खरा न्याय भक्कम पुराव्यासह


एका वर्षात दहा हजार लोकांना त्यांचा खरा न्याय मिळवून देणे विथ स्ट्रॉंग इव्हिडन्स द्वारे हा माझा ध्यास आहे


mission true justice with strong evidence

Mission to help 10000 people get true justice are right with strong evidence

शनिवार, २५ मे, २०२४

स्पॅम कॉल्सचा AI कर्दनकाळ !


स्पॅम कॉल्सचा AI कर्दनकाळ !

सध्याच्या काळात, दररोजचे काम करत असताना माझ्यासमोरचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे सतत वाजणारा फोन. दररोज जवळजवळ २५-३० स्पॅम कॉल्स येतात. आणि त्यातही वाईट म्हणजे यातीलही बहुतांशी रोबोकॉल्स असतात. रोबो कॉल्स म्हणजे आधीच रेकॉर्डिंग केलेले ऑटोमॅटिक कॉल्स. (त्यांना रागावून शिव्याही देता येत नाही !). 
अगदी अनपेक्षितपणे यावरचा उपाय अचानक काल माझ्या वाचनात आला. Truecaller ने नुकताच मायक्रोसॉफ्ट AI च्या सोबतीने आणलेले एक नवीन फीचर “Personal Voice Assistant”
कल्पना करा: तुमचा फोन वाजला आणि "कोण असेल?" असा विचार करण्याऐवजी, Truecaller च्या स्पॅम-डिटेक्टिंग AI ने आधीच “तुमच्या आवाजात” तो फोन घेतला. कॉल करणाऱ्याची ओळख आणि कॉल चे कारण विचारले. आणि लगेचच ते स्क्रीनवर तुम्हाला दाखविले. आता पुढे फोनवर स्वतः बोलायचे, AI असिस्टंटला आणखी प्रश्न विचारायला सांगायचे की कॉल बंद करायचा हे ठरवायचे ! 
आहे की नाही जबरदस्त. ऑटोमॅटिक रोबो कॉल्सना ऑटोमॅटिक AI उत्तर. 

हा तुमचा डिजिटल सहाय्यक अगदी तुमच्यासारखा आवाज काढतो. Truecaller च्या या नवीन फिचरमुळे, तुम्ही तुमचा आवाज रेकॉर्ड करू शकता आणि AI त्याची पूर्णपणे नक्कल करून बोलू शकेल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या AI-चालित आवाजात कॉल्स उत्तर देऊ शकता, अगदी फोन उचलल्याशिवाय. हे जणू तुमचा “डिजिटल जुळा भाऊ” (Digital Twin) तुमच्यासाठी कॉल्स हाताळत आहे.

▪️Truecaller ने हे फिचर साकारण्यासाठी Microsoft च्या Azure AI स्पीच टेक्नॉलॉजीशी भागीदारी केली आहे.

▪️Truecaller मध्ये पर्सनल व्हॉइस सेटअप कसे करावे ?

▪️Truecaller मध्ये तुमचा पर्सनल व्हॉइस सेटअप करणे सोपे आहे. येथे कसे करायचे ते दिले आहे:

▪️Truecaller अॅप डाउनलोड किंवा अपडेट करा: तुमच्या स्मार्टफोनवर Truecaller चे नवीनतम आवृत्ती असणे आवश्यक आहे.

▪️Truecaller प्रीमियम सबस्क्राईब करा: हे फिचर प्रीमियम वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे, ज्याची किंमत भारतात प्रति महिना ९९ रुपये आणि प्रति वर्ष ६९९ रुपये आहे.

👉सेटिंग्ज मध्ये जा: अॅप उघडा, सेटिंग्ज मध्ये जा आणि नंतर असिस्टंट सेटिंग्ज उघडा.

👉ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा: तुमचा पर्सनल व्हॉइस सेटअप करण्यासाठी सूचनांचे पालन करा, इथे तुमचा आवाज रेकॉर्ड करता येईल. या रेकॉर्डिंगमधून AI शिकेल आणि तुमच्या आवाजात फोन कॉल वर real time मध्ये बोलू शकेल.
gito 7057573102 GITO

गुरुवार, २३ मे, २०२४

New AI Voice Cloning Scams




 AI शी संबंधित दोन घटना आजच माझ्या वाचनात आल्या…पहिली अमेरिकेत घडलेली….दुसरी आपल्या भारतात…..!


लेक्सी बोगनच्या आयुष्यात गेल्या वर्षी मोठा बदल झाला. तिला मेंदूजवळ ट्युमर झाल्याचे कळले. दहा तासांच्या शस्त्रक्रियेमुळे बोगनच्या आवाजाच्या तारांवर (Voice Cord) परिणाम झाला आणि २२ वर्षांच्या बोगनला तिचा आवाज गमवावा लागला. 


त्यानंतर काही दिवसांनी डॉक्टरांनी तिला संपर्क करून एका प्रयोगात सहभागी होण्याची विचारणा केली. त्यांनी तिला OpenAI च्या नवीन व्हॉईसबॉट प्लॅटफॉर्म, Voice Engine, वापरण्यासाठी विचारले. बोगनने त्या प्रयोगामध्ये सहभागी व्हायचे ठरवले.


बोगनच्या आवाजाचा अभ्यास करण्यासाठी AI मॉडेलने तिच्या आधी रेकॉर्ड केलेल्या १५ सेकंदांच्या व्हिडिओचा वापर केला. आणि Voice Cloning करून तिचा आवाज फोन मधील अँप मध्ये save करून दिला. आता, बोगन तिच्या फोनवर काहीही टाईप करून तिच्या स्वतःच्या आवाजात वाचून घेऊ शकते. तिच्या आवाजात हसूही शकते. सर्व भावभावना आपल्या शब्दात आणि आवाजात व्यक्त करू शकते


आवाज गमावलेल्या रुग्णांसाठी दुसऱ्याचा आवाज ऐकणे, किंवा रोबोटिक आवाज ऐकणे फार रुक्ष आणि कठीण असते. मात्र OpenAI सारख्या आवाजाच्या क्लोनिंग तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या अनेक कंपन्या हा एक मोठा प्रॉब्लेम सोडवीत आहेत.


दुसरी घटना लखनौ मध्ये घडलेली. सरकारी नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीला एका अनोळखी नंबर वरून फोन आला. फोनवर त्याचा मेव्हणा बोलत होता. तो कोणत्यातरी अडचणीत सापडला होता आणि त्याला त्वरित पैशांची गरज होती. फोन घेणाऱ्या माणसाने (नाव मुद्दाम लपवलेले आहे) घाईघाईत दीड लाख रुपये ट्रान्सफर केले. 


थोड्यावेळाने काम झालं का विचारण्यासाठी मेव्हण्याला फोन केला तेव्हा कळलं की मेव्हण्याने फोन केलाच नव्हता. स्कॅमरने सोशल मिडीया मधून त्याच्या मेव्हणाचा आवाज घेतला. Voice Cloning वापरून फोन केला आणि दीड लाख कमावले.


अशाच घटना मुलांच्या बाबतीतही होत आहेत. पालकांना मुलांच्या आवाजात खोटे फोन जात आहेत. त्यामुळे आपल्या मुलांचे फोटो, व्हिडिओ, त्यांचा ठावठिकाणा समजू शकेल अशा पोस्ट सोशल मीडिया वर टाकणे बंद करा. 


दोन्ही घटनांमागचं तंत्र तसं सारखंच. पण वापर वेगवेगळे ! चांगले किंवा वाईट….तंत्रज्ञान आयुष्य बदलणार आहे..आणि ही प्रक्रिया थांबवणे जवळपास अशक्य आहे. तेव्हा स्वतःला तयार करा ..अपडेटेड राहा.

GITO 7057573102

बुधवार, २२ मे, २०२४

प्रवासात मला एक सुखद अनुभव मिळाला त्याची पोस्ट टाकत आहे.


 प्रवासात मला एक सुखद अनुभव मिळाला त्याची पोस्ट टाकत आहे.


काही अफलातून व्यक्तिची भेट अचानक आपल्याशी होते आणि आपली एका नवीन जगाशी ओळख होते.

काल गोव्याहून येताना केवळ कर्मधर्मसंयोगाने  किंवा ब्रह्मांडाची योजना असेल म्हणून श्रीयाशी ओळख झाली.

आपण मेडिटेशनद्वारे सर्व जगताला एर्जी,उर्जा देतो. एनर्जीलेव्हलवर सगळे एकच आहोत. तशाच प्रकारची माहिती श्रीयाकडून मिळाली.

श्रीयाने प्रवासात आपल्या बॅगेत एक पर्शियन मांजर आणले होते. तिने सांगितले ती त्याच्याशी चक्क बोलते आणि त्याच्याशीच नव्हे तर जगातल्या कुठल्याही प्राण्याशी अगदी पाली,झुरळांपासून हत्ती, पेग्विन पर्यन्त.

तिने Animal communicaters चा कोर्स केला आहे.

तिने प्राण्यांबद्दल एवढ्या गमतीजमती सांगितल्या. प्राणी ही हटवादी,नटखट असतात.त्याच्या मनात नसेल तर ते आपल्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत.

ति तिच्या लाडक्या कुत्र्याच्या सोलशी बोलते,तो जाऊन ४ वर्ष झाली. तिला तो परत येयला हवा आहे आणि नियती,किंवा तिची इच्छाशक्ति म्हणा तो तिच्यापोटीच जन्म घेणार आहे. झाडांशी,घराशी सुध्दा ती बोलते. ती होपोनोपोनो प्राण्यांना करते.

तिच्या घरात कोणी नसतानाचोरी झाली होती. तिच्याकडे त्यावेळेला शेजारचे मांजर आले होते. त्याच्याशी संवाद साधल्यावर तिला कशी चोरी झाली ते कळले.(अर्थात कायदयाच्या संज्ञेत हे बसत नाही.)

 माझ्या झाडाला काही केल्या फुले येतच नाहीयेत,कळ्या खूप येतात पण गळून पडतात. ती माझ्या झाडांशी बोलून मला उपाय सांगणारआहे.

श्रीयाशी माझी भेट होणे यामागे नक्कीच ब्रह्मांडाचा काहीतरी हेतू असेलच

मेडिटेशनमुळेच खूप छान,छान नवनवीन मार्ग सापडत आहेत.

यासाठी वृंदा मॅडम व नेटभेटला मनापासून परत,परत धन्यवाद