गुरुवार, २ जानेवारी, २०२५

एकाला फक्त अडथळे दिसतात, तर दुसऱ्याला त्याच ठिकाणी संधी दिसतात. तेच जग, पण वेगवेगळा दृष्टिकोन.

 .



किती विलक्षण आहे ना, दोन लोकांचा एक दिवस सारखाच असतो. दोघे समान गोष्टी अनुभवतात, पण दोघांचीही अनुभूती अगदी वेगळी असू शकते. एकाला फक्त अडथळे दिसतात, तर दुसऱ्याला त्याच ठिकाणी संधी दिसतात. तेच जग, पण वेगवेगळा दृष्टिकोन.


श्रीकांत सोशल मीडियावर स्क्रोल करत होता आणि नकळत, सगळ्या गोष्टी कशा बिनसल्यात, याची यादीच त्याच्या मनाशी तयार होत होती. त्याचवेळी उशीर होत असलेला प्रोजेक्ट, उत्तर न मिळालेल्या ई-मेल, आणि ट्रॅफिक जॅम... सगळं जणू गिरवल्यासारखं एकच गोष्ट सांगत होतं , “बघा, सगळंच माझ्या दृष्टीने उलट होत आहे ! काहीही मनासारखं घडत नाहीये.”


आणि मग अचानक त्याला जाणवलं — मीच माझ्या चिडचिडीला आधार देण्यासाठी कारणं शोधत आहे.


कुठल्याशा एका पुस्तकात वाचलेली एक गोष्ट त्याला आठवली आणि त्याने त्याच क्षणी ठरवलं, त्या पुस्तकात सांगितलेला एक छोटासा प्रयोग करायचा. भोवतालच्या चांगल्या गोष्टी शोधून पाहायच्या. सकाळी लिफ्ट मध्ये जाताना एका अनोळखी व्यक्तीने दरवाजा उघडून धरला होता. कॅफेमध्ये गेलो तेव्हा तिथल्या मुलाने माझ्या ऑर्डरची आठवण ठेवून मला पाहिजे तशी कॉफी न सांगता बनवून आणली. एका क्लायंटने आवर्जून ईमेल करून काम आवडलं असल्याचं कळवलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जितक्या जास्त चांगल्या गोष्टी श्रीकांतने शोधल्या, तितक्या त्या वाढल्यासारख्या वाटल्या.

मित्रांनो, तुम्हीही हे करून पहा. तुम्हालाही हाच अनुभव येईल. आयुष्य म्हणजे एक भलामोठा बुफे आहे. त्यात आवडीचे पदार्थही आहेत आणि न आवडणारे देखील. कडवट क्षण किंवा गोड क्षण—आपण आपल्या ताटात काय वाढून घ्यायचं ते आपल्या हातात आहे. आपल्या सोबत काय घडतंय यावर काहीच अवलंबून नाही, तर आपण कशावर लक्ष केंद्रित करतोय यावर सर्व अवलंबून आहे.


तुम्ही कधी नोटीस केलंय का की जेव्हा जेव्हा आपला मूड खराब असतो तेव्हा तेव्हा अपॊआप आपल्यासोबत चुकीच्या गोष्टी घडायला लागतात? हातातील वस्तू कुठे ठेवली आठवत नाही, Wifi अचानक बंद होतो, मोबाईल हातातून सटकतो किंवा कॉफी सांडते...लक्षात घ्या या गोष्टी आपण tune केलेल्या असतात म्हणून आपल्यासोबत घडताना दिसतात.


कदाचित तुम्हाला हे काहीतरी मोटिव्हशनल ग्यान वाटेल पण हे खरंच आपल्या आयुष्याला बदलू शकेल एवढं पॉवरफुल आहे. जेव्हा आपण चांगल्या लोकांची अपेक्षा ठेवतो, तेव्हा आपण जास्त हसतो, मोकळेपणाने वागतो, संवाद साधतो… आणि काय होतं? लोक खरंच मदतीसाठी पुढे येतात. जेव्हा आपण संधी शोधतो, तेव्हा आपण त्या घेण्याचा धोका पत्करतो. आणि मग संधी खरंच समोर येतात.

आज रात्री झोपण्याआधी एक गोष्ट आवर्जून करा — मी स्वतःला कोणती गोष्ट सांगतोय याबद्दल अधिक जागरूक राहा. कारण तुम्ही जी पण स्टोरी स्वतःला सांगत आहात त्याचे पुरावे आसपास दिसायला लागतील ! म्हणूनच तीच स्टोरी स्वतःला सांगा जी जगायला तुम्हाला आवडेल !


धन्यवाद,

सोमवार, ३० डिसेंबर, २०२४

जड झालेले आई-बाप... नीट वाचा आणि मगच शेअर करा 🙏

जड झालेले आई-बाप... नीट वाचा आणि मगच शेअर करा 🙏

नेहमीप्रमाणे 5.30 ला ऑफिस सुटल्यावर परतीची 5.44 ची बोरीवली फास्ट लोकल पकडून मी घरी निघालो.ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्राचा 'राजेशचा'मला फोन आला... म्हणाला,"मला थोडी शॉपिंग करायची आहे तू मालाडला उतरल्यावर थोडं थांब, मी आलोच..!"
मी"हो थांबतो"म्हटलं. 

मालाड स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच एम.एम. मिठाईवाल्याचं दुकान आहे उजवीकडे पाणपोई आहे आणि बाजूलाच पार्किंगसाठी आडवे लोखंडी अँगल लावलेले आहेत. त्यावर चढून मी राजेशची वाट बघत बसलो.

एक 70-75 वयाचे गृहस्थ, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा, थोडे मळकटलेले सदरा-धोतर नेसलेले माझ्या जवळ आले. मी त्या लोखंडी अँगलवर 3-4 फुटांच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडघे धरले आणि म्हणाले,"ए बाबा.. एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल...!"

ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांमधले वाटत नव्हते किंवा ते रोज भीक मागत असतील असंही त्यांना बघून वाटत नव्हतं..

अचानक एका वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर मला एकदम अवघडल्यासारखं झालं. मी त्यांचे हात धरून ताबडतोब अँगलवरून खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं,"आजोबा तुम्हाला भूक लागलीय?हे घ्या पन्नास रुपये तिथून घ्या तुम्हाला जे हवंय ते..!" 

ते म्हणाले,"नको बाबा नको.. पैसे नको..एक वडापाव घेऊन दे तेवढा"

मी म्हटलं,"थांबा इथेच मी घेऊन येतो."
एम एम मधून मी लगेच दोन वडापाव आणून आजोबांना दिले.ते जमिनीवर बसून खाऊ लागले.
मला म्हटले,"वर नको बसू , पडशील... इथं बस माझ्या बाजूला,कुणी सोबत बसलं की मलाही जातील दोन घास !"

मी आदरंच बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली...कुठून आलात?कुठे जायचंय?कोणाला शोधताय?वैगेरे वैगरे.

"मी हिंगोली वरून आलो आहे. तिथेच एका खेडेगावात राहतो बायकोसोबत. तुझ्याएवढा आमचा एकुलता एक मुलगा इथं मुंबईत मोठया कंपनीत इंजिनीअर आहे.दोन वर्षांपूर्वी त्याने प्रेमविवाह केलाय.त्याची बायको शिकलेली,नव्या विचारांची आहे. तिला सासू-सासरे म्हणजे आम्ही गावठी (गावंढळ) वाटतो.तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही. त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या 2 वर्षांपासून.परवा त्याचा माझ्या या मोबाईलवर फोन आला होता. म्हणाला,अमेरिकेत नोकरी मिळाली आहे. बायकोला घेऊन 10 वर्षांसाठी जात आहे...

इथं मुंबईत असताना येत होता गावी आम्हा म्हातारा म्हातारीला सहा महिन्यातून एकदा भेटायला.मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हटलं तर,वेळ नाही आता परवा लगेच विमानाने निघायचंय असं म्हणाला. 

पुढचे 10 वर्ष जगतोय की मारतोय कोण जाणे.. म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जाऊन.काल संध्याकाळ पासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय. पण इथं मालाडमध्ये विमानतळ नाही असं म्हणतायत इथली लोकं..!"

मी म्हणालो, "बरोबर म्हणतायत लोकं, इथं मालाडला नाही,सांताक्रुज ला आहे Airport.
आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले,"परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता मला विमानतळाचा. हा मोबाईल पण खराब झालाय वाटतं... फोनच नाही येत कालपासून माझ्या मुलाचा...त्याला सांगितलं होतं मी मुंबईत येतोय तुला भेटायला म्हणून"

आता माझ्या एका हातात त्यांचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता. आधी मोबाईलची बटणं दाबून पहिली...मोबाईल व्यवस्थित चालू होता नेटवर्क ही फुल होतं... 

मी विचारलं,"तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन?"
"मला फोन लावता येत नाही, उचलता येतो फक्त" ते म्हणाले.
मी received call मध्ये जाऊन शेवटी परवा आलेल्या call वर डायल केलं.. समोरून फोन cut करण्यात आला...

मग मी तो कागद उघडून पाहिला...त्या कागदावर पत्ता होता- छत्रपती शिवाजी विमानतळ, एम एम हॉटेल समोर, मालाड पश्चिम, मुंबई.
मी समजून गेलो होतो, त्या मुलाने आपल्या आई वडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता तो त्यांचा फोनही घेत नव्हता... मला कळून चुकलं होतं की ज्या विमानात आता त्यांचा मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्यांच्या दिशेने येणार नव्हतं. 
तेवढ्यात माझा मित्र तिथे पोहोचला. त्याला मी म्हटलं दोन मिनिटं थांब फक्त राजेश... 

आणि मी आजोबांकडे पाहत विचारात पडलो...
मला कळत नव्हतं,मुलाकडून होणारी त्यांची ही प्रतारणा त्यांना खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असून ती स्वीकारायची नव्हती?  कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नसेल.. 

आजोबांना मी म्हणालो, "आजोबा एव्हाणा तुमच्या मुलाचं विमान सुटलं असेल.. तुमची आणि त्याची भेट होईल असं मला वाटत नाही. तुम्ही जसे आलात तसे परत जा गावी.आजी तुमची वाट बघत असतील घरी.एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले.

अश्रू भरल्या डोळ्यांतून ते माझ्याकडे पाहत होते. तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवले.. आणि विचारलं,"मगासपासून मी तुमच्या हातात तो डब्बा पाहतोय,काय आहे त्या डब्यामध्ये? "

ते म्हणाले,"मुलाच्या आवडीचे बेसनाचे लाडू आहेत. त्याच्या आईने बनवून पाठवलेत त्याच्यासाठी...
आता मात्र एका धारदार सुऱ्याने काळजात वार करावा आणि सर्व अंतःकरण रक्तबंबाळ व्हावं अशी माझी अवस्था झाली. मी निशब्द तसाच त्यांच्याकडे बघत बसून राहिलो....

तेवढ्यात मित्राचा आवाज आला,"चल ना ऐ...!" 
आणि मी भानावर आलो...त्या गर्दीतून मित्राच्या मागे चालत राहिलो... 

घरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती.राहून राहून एकच प्रश्न पडत होता... 

'आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा, भुकेने हतबल झालेला तो माणूस..आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडवांच्या डब्यातल्या एक लाडू खाऊ शकत नव्हता...? इतकं प्रेम????'

लेखक - माहित नाही 🙏

#म्हातारपण #आई #वडील #स्वार्थ #माणुसकी

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

ब्लॅक फ्रायडे हा दिवस खरेदीच्या सवलतींसाठी ओळखला जातो, पण त्यामागे एक अनोखी कथा आहे.

ब्लॅक फ्रायडे हा दिवस खरेदीच्या सवलतींसाठी ओळखला जातो, पण त्यामागे एक अनोखी कथा आहे. ही कथा 1950 च्या दशकातील फिलाडेल्फिया शहराशी जोडलेली आहे, जिथे Thanks Giving नंतरचा शुक्रवार नेहमी गोंधळाचा दिवस ठरत होता. 🌀

त्या काळात फिलाडेल्फियामध्ये दरवर्षी आर्मी-नेव्ही फुटबॉल सामना होत असे, जो खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांना आकर्षित करायचा. सामन्याआधीच्या शुक्रवारी फुटबॉल चाहत्यांनी शहर गजबजून जात असे. रस्ते गर्दीने फुलून जायचे, इतकी गर्दी असायची की संपूर्ण शहरातील वाहतूक ठप्प होत असे.

स्थानिक पोलिसांना दिवस-रात्र काम करावे लागले, गर्दी सांभाळावी लागायची आणि ट्रॅफिक व्यवस्थापिन करताना पोलीस यंत्रणेची दमछाक होत असे. त्यामुळेच त्यांनी या दिवसाला “ब्लॅक फ्रायडे” हे नाव दिलं – त्यांच्या दृष्टिकोनातून हा एक डोकेदुखीचा दिवस होता! 🚔😵‍💫 . पण एवढ्या साऱ्या लोकांच्या अचानक येण्याने शहरामधील विविध दुकानांमध्ये विक्रीही आपोआपच वाढत असे.

1960 च्या दशकात, व्यापाऱ्यांनी या नावाला सकारात्मक वळण दिलं. 🛒 व्यापाऱ्यांनी हा दिवस तोट्यातून नफ्यात (अकाउंट्समधील "रेड" वरून "ब्लॅक" मध्ये जाणारा) जाणारा दिवस म्हणून प्रसिद्ध केला. गर्दीला आपल्याकडे खेचण्यासाठी आपोआपच भल्यामोठ्या सवलतींचीही प्रथाच पडली.

हळूहळू ब्लॅक फ्रायडे हा खरेदीचा मोठा सण म्हणून ओळखला जाऊ लागला, आणि आज तो फक्त अमेरिकेतच नव्हे तर जगभरात साजरा होतो! 🌍 🎁✨

धन्यवाद,

सतफुल सोनवणे
7057573102

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४

उत्तराखंडच्या एका छोट्या गावातील मुलाने 5000 करोडची बँक उभी केली त्याची गोष्ट! 🌟🏦उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचचा गोविंद सिंग


 उत्तराखंडच्या एका छोट्या गावातील मुलाने 5000 करोडची बँक उभी केली त्याची गोष्ट! 🌟🏦


जिम कॉर्बेट नॅशनल पार्क पासून 40 किलोमीटर दूर असलेल्या एका गावात गोविंद सिंग जन्मला. त्याचं बालपण खूप कठीण होतं. रोज शाळेत जायला त्याला 7 किलोमीटर चालावं लागायचं. कॉलेज चालू असतानाच पैसे कमावण्यासाठी एका छोट्याशा 18x6x6 फूटाच्या घरात तो विद्यार्थ्यांना शिकवायचा. त्याच्या मनात काहीतरी करण्याची जिद्द होती. 💪🎓


BCom झाल्यावर, स्टेट बँक ऑफ पटियाला मध्ये probationary officer म्हणून त्यानं करिअरची सुरुवात केली. पाच वर्षांनंतर, 1988 मध्ये सूर्या फिनकॅप मध्ये जॉइन झाला. तिथे मुंबई ऑफिस सेट करण्यासाठी त्याला मुंबईला पाठविलं. नंतर बँक ऑफ इंडोनेशिया आणि UTI बँकेत काम केलं, आणि मग 2000 साल आलं. 🌍📈


गोविंद ICICI बँकेत जॉइन झाला आणि 2006 पर्यंत microfinance डिपार्टमेंटचा बिझनेस हेड झाला. त्यानं इतिहास रचला - भारतात पहिल्यांदा business correspondent मॉडेल सुरू केलं, ज्यामुळे गावकऱ्यांना बँकेत न जाता पैशांचे व्यवहार करता येऊ लागले. 🏦📲


पण गोविंदला दिसलं की अजूनही 40 करोड लोकांना 10,000 रुपये सारखी छोटी रक्कम उधार मिळणं कठीण होतं. टेक्नॉलॉजी पेक्षा आधी या इंडस्ट्रीला access ची गरज होती. म्हणून त्यानं ICICI मधली मोठ्या पगाराची नोकरी सोडली. आणि वाराणसीच्या घाटावर 2009 मध्ये उत्कर्ष मायक्रोफायनान्स ची सुरुवात केली. 🌱💡


त्याची कल्पना सोपी होती - जिथे गरज आहे पण सेवा उपलब्ध नाही तिथे फायनान्स करायचं. त्यानं UP आणि बिहार मार्केटवर फोकस केला, जिथे भारतातल्या गरीबी रेषेखालील 40% लोक राहतात. Aavishkar Goodwell या कंपनी कडून त्यानं 6 करोड रुपये कर्ज उभे केले. 💰📊


या पैशांचा वापर करून, पहिल्या वर्षातच उत्कर्ष ने 4 branches, 8000 कस्टमर्स आणि 6.3 करोडचं पोर्टफोलिओ उभा केला. पुढे एका सर्वेमध्ये त्यांना लक्षात आलं की भारतातील 3 करोड लघु उद्योजकांना 50,000 ते 3 लाख रुपयांमधले बिझनेस लोन मिळवणे देखील शक्य होत नाही. हा प्रॉब्लेम सोडवायचा होता. 📈📝


मार्च 2012 मध्ये, त्यानं Micro Enterprise Loan (MEL) स्कीम 'समृद्धी' सुरू केली. UP आणि बिहारच्या निमशहरी आणि ग्रामीण भागात तीन दिवसांत विनातरण लोन द्यायला सुरुवात केली. 2013 पर्यंत NBFC लायसन्स मिळालं, 3 लाख कस्टमर्स झाले, आणि 448 करोडचं लोन बुक झालं. 📄🏘️


उत्कर्ष मध्ये डिफॉल्ट्स कमी होते कारण ते फक्त joint liability ग्रुप्सना लोन द्यायचे, जिथे 4-10 गावकरी मिळून लोन परतफेडीची गॅरंटी द्यायचे. 2016 मध्ये housing loan सेगमेंट मध्ये एंट्री केली, आणि RBI नं लायसन्स दिलं. 23 जानेवारी 2017 ला उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक जन्माला आली. 🏡💼


2017 मध्ये, उत्कर्ष Personal Loans, Commercial Vehicle Loans, आणि Construction Equipment Loans मार्केट मध्ये देखील उत्कर्षने सुरवात केली. त्यांचं लोन बुक 3200 करोड पर्यंत वाढलं, 15 लाख कस्टमर्सची सेवा करू लागले. 🚗🚜

क्या आपको ऐसा गुप्त कॅमेरा  चाहिए ?

 जो किसी को नजर नाही आएगा जीसका live विडिओ  केवल     आप ही काहीसे भी मोबाईल पे देख पाएँगे


Website :- www.securityplanet.co


Product  वीडियों :- - https://www.youtube.com/user/MrSatful?sub_confirmation=1


Website social media & Product Photo , व्हिडिओ information :-  https://linktr.ee/Satful


Follow thislink to view our catalogue on WhatsApp: https://wa.me/c/919822358631


हॅलो📞📱 आपको  प्रॉडक्ट देखना है तो व्हिडिओ कॉल लगाके दिखा सकतेहै. 11am to 7pm


आप मुझे hi मेसेज भेजने के बाद उपर की लिंक ऍक्टिव्हेट ओपन होगी🙏

उत्कर्षचं लोन बुक 14,000 करोड आणि डिपॉझिट्स 19,496 करोड पर्यंत पोहोचल्यावर, 21 जुलै 2023 ला कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाली. त्यांच्या 500 करोडच्या IPO ला तब्बल 102 पट सब्स्क्रिप्शन मिळालं! 📊💥


आज, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचचा पोर्टफोलिओ 18,000 करोड, डिपॉझिट्स 17,000 करोड आहेत आणि 2023 मध्ये त्यांनी आतापर्यंतचा सर्वाधिक 3579 करोडचा रेव्हेन्यू आणि 452 करोडचा प्रॉफिट कमावला. 26 राज्यांमध्ये 888 ब्रँचेस आणि 320 ATMs सोबत, आज बँकेची किंमत 4708 करोड आहे. 💵🏦


कोणाला वाटलं होतं की उत्तराखंडच्या एका छोट्या गावातला मुलगा भारतातली चौथी सर्वात मोठी स्मॉल फायनान्स बँक उभी करेल? 🌟🚀


बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४

तो दिवस आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता

तो दिवस आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता.ती गरोदर होती सातवा महिना सुरू होता.निर्भय तिच्या पोटात वाढत होता.माझा तीन महिन्यापासून पगार झाला नव्हता.मी कंत्राटी कामगार होतो.आणि वेळ अशी आली होती,घरातलं सगळं राशन संपलं होतं.गॅस संपून आठ दिवस झाले होते.स्टोव्ह मध्ये शिल्लक राहिलेल्या रॉकेलवर ती काटकसर करून कसातरी दोनवेळचा स्वयंपाक करत होती.टीव्ही चा रिचार्ज संपला होता.त्यामुळे टीव्ही ही बंद होता.रोजचं येणारं दूध बंद केलं होतं.घरमालक सारखा भाडे मागण्यासाठी फोन करत होता.तीन महिने मी काहीतरी करून ढकलत आणले होते.तिच्या सोनोग्राफीला आणि दवाखान्याला बराच बराच खर्च झाला होता.गावाकडे आई वडील आजी आणि बहीण असायचे.तिकडे ही लक्ष द्यावे लागायचे.दिपालीने कधीच कसला हट्ट केला नाही.उलट जितकी काटकसर करता येईल तेवढी ती करत होती.आणि माझ्यासोबत लढत होती.परंतु आजची परिस्थितीच भयंकर होती.घरात थोडेसे तांदूळ शिल्लक राहिले होते.बाकीचे सगळे डब्बे रिकामे झाले होते.एका वेळची सोय होणार होती.आणि मी माझ्या सगळ्या मित्रांना फोन करत होतो.पण माझा फोन कुणीच उचलत नव्हतं.कारण,त्यांना माहीत होतं हा पैसे मागायलाच फोन करतोय.सगळ्यांकडून उसने घेऊन झाले होते.त्यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती.एकाने फोन उचलला आणि मी बोलायच्या आधीच तो म्हणाला "नितीन थोडेफार पैसे असले तर दे ना,"मी काहीच उत्तर दिलं नाही फोन कट केला.आणि कुणालाच फोन करून काही होणार नाही.आपल्यालाच काहीतरी करावं लागेल असा मनात विचार करून मी खाली अंथरलेल्या चटईवर बसलो.

          तिची अंघोळ झाली होती.आम्ही पुण्यात पिंपळे निलख मध्ये भाड्याच्या रूममध्ये राहत होतो.टीव्ही बंद असल्यामुळे तिला करमत नव्हतं.तिचा मूड ठीक करण्यासाठी मी कधीतरी तिच्या आवडीचं "सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे हे गाणं गुणगुणत असायचो."मी गाणं गायला सुरवात केली,पण ती एकटक खाली मान घालून चटईवर बोट फिरवत होती.तिने लक्षच दिलं नाही.माझ्या कवितेवर ती फार प्रेम करते म्हणून कवितेच्या ओळी म्हणायला सुरवात केली तेव्हा,तिने झटकन माझ्याकडे रागाने पाहिलं.मी मान खाली घातली.घराच्या उंबऱ्यावर भूक हंबरडा फोडायला लागली की घराच्या आत जगातलं कोणतंच संगीत आणि कोणतीच कविता मनाला आनंद देऊ शकत नाही.हे कळलं.

       आम्ही बराच वेळ एकमेकांशी काहीच बोललो नाही.ती मान खाली घालून चटईवर बोटाने कोणती न उमटणारी अक्षरे गिरवत कुणास ठाऊक.सात महिन्याची गरोदर असणारी,एक नवा जन्म पोटात वाढवू पाहणारी,आई होण्याच्या उंबरठ्यावर असणारी दिपाली आमच्या बाळासाठी कदाचित एखादं नाव पुन्हा पुन्हा गिरवत असावी.मी तिच्या बोटाकडे एकटक पाहत होतो.ती स्वताला सावरत हळूहळू उठली.आणि दार उघडून बाहेर गेली.मी काहीच बोललो नाही.तिने शेजारच्या घरातून पेपर वाचण्यासाठी मागून आणला.कारण घरातली सगळी रद्दी या आठवड्यात तिने वाचून संपवली होती.रविवार होता पेपरला पुरवण्या होत्या.तिचा चेहरा थोडासा खुलला आणि ती पुन्हा खाली बसली.

      मी एकटक तिच्या डोळ्यात पाहत होतो.आणि ती पेपरची पाने चाळू लागली.आणि अचानक ती जोरात ओरडली. "ओ चंदनशिवे हे बघा काय आलंय पेपरला."मी म्हणलं 'काय दिपाली"? तर तिने मला विचारलं "काय ओ चंदनशिवे तुम्ही कवी आहात ना"? मी पार गळून गेलेल्या आवाजात म्हणलं "हो आहे पण काय करणार कवी असून आणि कविता तरी काय करणार आहे माझी" तिने हाताला गच्च धरून जवळ ओढलं आणि माझ्या समोर ते पेपरचं पान धरलं.आणि त्या पानावर असलेली जाहिरात मला आजही आठवतेय.!!अंशुल क्रियेशन प्रस्तुत,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय खुली काव्यवाचन स्पर्धा.!! रोख रकमेची तीन बक्षिसे.खाली पत्ता होता चिंचवड,पुणे.आणि संपर्क साधा म्हणून मोबाईल नंबर दिलेला होता.मी ती जाहिरात बघितली.दिलेल्या नंबरवर फोन केला.नाव सांगितलं.नावनोंदणी केली.आणि मी दिपालीकडे बघितलं तर तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक मला दिसायला लागली होती.ती म्हणाली, "चंदनशिवे घरात शेवटचे सत्तर रुपये आहेत.ते मी तुम्हाला देतेय.या स्पर्धेत जा.आजच स्पर्धा आहे ही. तिथं कविता म्हणा, आणि त्यातलं सगळ्यात मोठी रक्कम असणारं बक्षिस घेऊनच घरी या.पण एक सांगते आज,जर तुम्ही बक्षिस नाही मिळवलं तर संध्याकाळी या घरात फक्त नितीन चंदनशिवे आत येईल.कवी नितीन चंदनशिवे पुन्हा या जगात कुठं दिसला नाही पाहिजे."तिच्या या वाक्याने माझ्या पोटातलं काळीजच कुणीतरी मुठीत गच्च आवळून धरल्यागत वाटायला लागलं.

         ती पुढे म्हणाली, "जर माझ्या संसाराला तुमची कविता राशन मिळवून देऊ शकत नसेल तर ती कविता मला या घरात नकोय." सात महिन्याची गरोदर असणारी,सर्वसामान्य गृहिणीसारखी सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या दिपालीचं त्यावेळी काही चुकलं असेल असं मला अजिबात वाटत नाही.मी ते तिचं आवाहन स्वीकारलं.तिने घरातले जपून ठेवलेले सत्तर रुपये माझ्या 
हातात देताना माझा हात घट्ट आवळून धरला आणि मला आतल्या आत हुंदका आला.मी अंगात कपडे घातले.तिच्या डोळ्यात बघितलं आणि निघालो.

           मी चिंचवडला आलो.बसच्या तिकीटला दहा रुपये गेले होते.तिथं प्रवेश फी पन्नास रुपये होती.ती भरली.ती भरत असताना माझ्या मनाच्या वेदना नाही मांडता येणार.परत जाण्यासाठी दहा रुपये शिल्लक राहिले होते.मी ते जपून ठेवले.बाजूला सर्वांसाठी नाष्ट्याची सोय केली होती.मला खावंसं वाटलं नाही.कारण ती घरात उपाशी होती.मी मनातल्या मनात हादरून गेलो होतो.मी स्पर्धेला आलो होतो खरा पण,आतल्या आत माझ्या कवितेची माझ्या पत्नीशी स्पर्धा सुरू झालेली होती.कारण इथं जिंकलो तरच माझ्या अंतरंगात कविता आयुष्यभर जिवंत राहणार होती.आणि हरलो तर,फक्त शरीर घेऊन मेलेल्या मड्यागत जगणं समोर दिसत होतं.

      स्पर्धा सुरू झाली.बराच वेळ होत चालला होता.इतरांच्या कविता मला ऐकूच येत नव्हत्या.कारण डोळ्यासमोर फक्त माझी गरोदर असणारी बायको दिसत होती.आणि उपाशी पोटाने तिने मला मारलेली "ओ चंदनशिवे" ही हाक ऐकू येत होती.

       माझं नाव पुकारलं गेलं.मी स्टेजवर जायला निघालो.तेव्हा,मी आयुष्यातला फार मोठा जुगार खेळायला चाललो होतो आणि डावावर कविता लावली होती.अन तेवढ्यात पायऱ्या चढून वर जाताना,स्टेजवर बाबासाहेबांचा आणि रमाईचा एकत्र असलेला फोटो दिसला.अंगावर काटा आला.अंग थरथर कापलं.विज चमकावी तसं मेंदूत काहीतरी झालं.रमाईला आणि बाबासाहेबांना डोळे भरून बघून घेताना अंगात बळ येत गेलं.इतकं बळ आलं की त्या क्षणाला मी जगातली कुठलीही स्पर्धा जिंकू शकत होतो.माझी तमाशा नावाची कविता बेंबीच्या देठातून सादर केली.कविता संपली.टाळ्या कानावर यायला लागल्या.त्याच टाळ्यांच्या आवाजात पुन्हा येऊन जाग्यावर बसलो आणि पुन्हा डोळ्यासमोर संसार दिसू लागला.

          स्पर्धा संपली.पारितोषिक वितरण समारंभ सुरू झाले.त्यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार होतं.मंचावर ते उपस्थित होते.सूत्रसंचालकाने विजेत्यांची नावे जाहीर करण्यासाठी माईक हातात घेतला.आणि छातीत धडधड सुरू झाली.त्याने सर्वात आधी तृतीय क्रमांक पुकारला.टाळ्या सुरू झाल्या.तो तीन नंबरचा विजेता स्टेजवर गेला.त्याच्या हातात ट्रॉफी,गळ्यात शाल,पुष्पगुच्छ व ते पांढऱ्या रंगाचं पाकीट राजकुमार बडोले यांनी दिलं.त्याला तिथेच थांबवला.माझी नजर त्याच्या पांढऱ्या पाकिटावरून हटत नव्हती.सूत्रसंचालकाने दुसरा नंबर घोषित केला.माझं नाव नव्हतं.पोटात अजून गोळा आला.तो विजेता ही तसाच जाऊन स्टेजवर थांबला.आणि आता सुत्रसंचालक प्रथम क्रमांक घोषित करणार होता.मी डोळे गच्च मिटून घेतले.पोटात कळ यायला लागली होती.छातीत धडधड वाढेलेली होती.दोन डोळ्यांच्या बंद पापणीच्या आड फक्त गरोदर असणारी माझी पत्नी माझी वाट बघत असलेली दिसत होती.आणि कानावर आवाज आला."आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा विजेता आहे,ज्याने तमाशा कविता सादर केली असा नितीन चंदनशिवे."टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता.बंद पापणीच्या आतून डोळ्यांनी बांध सोडला आणि गालावर पाणी घळघळ वाहायला लागलं. सगळ्या जगाला मोठ्याने ओरडून सांगावं वाटत होतं मी आयुष्यभर कविता लिहिणार आहे.होय मी कवी म्हणून जिवंत राहणार आहे.

       टाळ्या थांबत नव्हत्या.आतल्या आत हुंदके देत मी स्टेजवर गेलो.बाजूच्या विंगेतून साडी नेसलेली मुलगी हातात ट्रे घेऊन येताना दिसू लागली.मी प्रमुख पाहुण्यांच्या समोर अंतर राखून उभा राहिलो होतो.फोटोवाला फोटो घेण्यासाठी कॅमेऱ्या डोळ्याला लावून तयार झाला होता.मी खिशातला मोबाईल काढला.आणि दिपालीला फोन केला.पहिल्या रिंगमध्ये फोन उचलला आणि म्हणली,"चंदनशिवे काय झालं सांगा ना लवकर,"ती बिचारी वेड्यासारखं हातात फोन धरून माझ्या फोनची वाट बघत बसली होती.मी फोन कानाला दाबून गच्च धरला आणि म्हणलं,"दिपाली पहिला नंबर आलाय." मला एक अपेक्षा होती तिने अभिनंदन वैगेरे म्हणावं अशी.पण ती तसलं काही बोलली नाही.ती पटकन म्हणाली,  'ते पहिला नंबर आलाय ठीक आहे पण रक्कम किती आहे ते सांगा आधी."आणि तेवढ्यात ती मुलगी ट्रे घेऊन जवळ आली.ती प्रमुख पाहुण्यांच्या हातात ट्रे देत होती.इकडं कानाजवळ दिपाली फोनवरून रक्कम विचारत होती.माझ्या डोळ्याला समोर फक्त पांढरं पाकीट दिसू लागलं.मी कसलाच विचार केला नाही.ते पाकीट मी हिसकावून हातात घेतलं.सगळेजण तोंडाकडे बघत होते.मला काहीच वाटत नव्हतं.मी स्टेजवर ते पाकीट फोडलं.दोन बोटं आता घालून त्या पाचशे रुपयाच्या नोट्या मोजल्या.दहा नोटा होत्या.आणि मी फोन कानाला लावून म्हणलं,"दिपाली,पाच हजार रुपये आहेत."हे वाक्य बोलताना घळकन डोळ्यातून एक धार जोरात वाहिली.त्यावर दिपाली काहीच बोलली नाही.तिचा एक बारीक हुंदका मात्र ऐकू आला.आणि जवळ जवळ वीस पंचवीस सेकंद आम्ही एकमेकांशी काही बोललो नाही.फक्त दोघांचे श्वास आम्ही अनुभवत होतो.मला वाटतं आम्ही दोघेजण किती जगू माहीत नाही.पण,आयुष्यातला तो पंचवीस  सेकंदाचा काळ हा  सुवर्णकाळ वाटतो मला.आम्ही नवरा बायकोने त्या पंचवीस सेकंदाच्या काळात आमचं जन्मोजन्मीचं नातं मुक्याने समजून घेतलं.नंतर हातात ती ट्रॉफी आली.गळ्यात शाल पडली.फुलांचा तो गुच्छ घेतला.आणि मी तिथून कसलाही विचार न करता निघालोसुद्धा.त्या फोटोवाल्याला हवी तशी पोझ मिळालीच नाही.आणि माझ्या त्या वागण्याने सगळेजण मला बावळट आहे की काय अशा नजरेने बघत होते.फोटोवाला ही रागानेच बघत होता.मी थेट गेटमधून पांढरं पाकीट खिशात कोंबून बाहेर पडलो.

        घरी येताना तिच्यासाठी मिठाई घेतली.तिला समोसे आवडतात.म्हणून गरमागरम समोसे ही घेतले.तिसऱ्या मजल्यावर आमचं घर होतं.मी अक्षरशा पायऱ्या तुडवत पळत पळत धापा टाकत दारात आलो.दार वाजवणार तेवढ्यात तिनेच दार उघडलं.आणि म्हणाली,"कवी नितीन चंदनशिवे यांचं माझ्या संसारात स्वागत आहे." हुंदका दाटून आला.मला स्पर्धा जिंकल्याचा,पाच हजार मिळाल्याचा,आनंद नव्हताच.मी आयुष्यभर तिच्यासमोर ताठ मानेने कविता लिहिणार होतो कवी म्हणून तिच्या नजरेत जगणार होतो.कवी म्हणून जिवंत राहणार होतो.याचा आनंदच नाही तर मी हा महोत्सव माझ्या काळजाच्या गाभाऱ्यात आतल्या आत साजरा करत होतो.तिने माझे पाणावलेले डोळे पुसले.तिच्यासाठी खायला आणलेलं तिच्या हातात दिलं.आम्ही दोघेही खायला बसलो.आणि ती म्हणाली, "चंदनशिवे आपल्याला जर मुलगा झाला तर आपण त्याचं नाव निर्भय ठेवायचं.कारण आज पोटात तो सारखं लाथा मारून मला त्रास देत होता.तो सोबतीला होता म्हणून मनात भितीच नव्हती.तुमचा फोन येणार आणि तुम्हीच जिंकलाय असं सांगणार  असंच वाटत होतं. " 

       सगळी मिठाई दोघांनी खाल्ली.तिने कागद आणि पेन घेतलं.आणि किराणा मालाची यादी लिहायला सुरुवात केली.तिने ती यादी लिहून झाल्यावर माझ्या हातात दिली.आणि “जा घेऊन या लवकर सामान” अस म्हणून ती पिशवी घेण्यासाठी उठली.
आणि त्याच कागदाच्या मागील बाजूस मी कविता लिहिली.ती अशी….

              “माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा,
              माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात
              किराणा मालाची यादी लिहिते,
              ती यादीच 
              माझ्यासाठी जगातली 
              सर्वात सुंदर कविता असते…
              आणि यादीची समिक्षा
              फक्त आणि फक्त
              तो दुकानदारच करत असतो
              तो एक एक शब्द खोडत जातो
              पुढे आकडा वाढत जातो
              आणि कविता
              तुकड्या तुकड्याने 
               पिशवीत भरत जातो
              आयुष्यभर माहीत नाही
              पण,कविता आम्हाला
              महिनाभर पुरून उरते
              कविता आम्हाला महिनाभर पुरून उरते”

      मित्रहो,संघर्षाच्या सुगंधी वाटेला सुद्धा वेदनेचे फास असतात.बंद डोळ्यांनाच फक्त सुखाचे भास असतात.पण जोडीदारावर अमाप माया आणि विश्वास ठेवला की,संसाराच्या या गाडीत बसून प्रवास करताना येणाऱ्या वादळात ही गाडी कधी थांबत नाही.आणि म्हणूनच उंबरठ्यावर भूक वेदनेचे अभंग गात असली तरीही आतल्या घरात नवरा बायकोने कायम आनंदाच्या ओव्या गात जगलं पाहिजे.यासाठी शब्दांचा लळा आणि आनंदाचा गळा हा असलाच पाहिजे.कारण,आयुष्य सुंदर आहेच आणि आयुष्याचं गाणं हे अशाच सुख दुःखाच्या सुरांनी नटलेलं असलंच पाहिजे.
   चालत राहा आयुष्याचे आनंदगाणे हसत हसत गात राहा.

लेखक नितीन चंदनशिवे
मु.पो.कवठेमहांकाळ
जि सांगली.
7020909521

(आपली प्रतिक्रिया आपण लेखकाला जरूर कळवू शकता.लेखकाशी थेट कॉल वर बोलू शकता. किंवा व्हाट्सअप ला मेसेज करू शकता.)

शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

मला आवडलाय तुम्हालाही नक्कीच आवडेल जेव्हा मंदिरात आणि मस्जीद मध्ये जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल.

 मला आवडलाय तुम्हालाही नक्कीच आवडेल



🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎

🌎   "बिल गेट" चे भारतीय   🌎

🌎      लोकांविषयी मत...    🌎

🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎

         सर्वांनी हे नक्की वाचाच 

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



तो म्हणतो, 

"भारत हा जगात 

सगळ्यात श्रीमंत देश आहे.

या देशातील मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी "भारत हा महासत्ता होऊ शकतो,

परंतु ,

मजेची गोष्ट ही आहे कि, या देश्यातील 

लोकांना आपण गुलाम आहोत हेच कळत नाही म्हणून,

शेतकरी देवाला 

दोष देत आत्महत्या करतो...।

कारण ,

त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण 

आहे हेच त्याला कळत नाही ...।


या देश्यातील गरीब जनतेला कळत 

नाही कि तुमच्या गरिबीला कोण जबाबदार आहे ?


इथल्या तरुणाला 

कळत नाही तुमच्या बेरोजगार असण्याला कोण जबाबदार आहे...?


भयाण वास्तव...


१) इथल्या तरुणाला गुलामी कळू नये 

म्हणून, क्रिकेट, चित्रपट, देव, धर्म, मंदीरे, यांची अफूची गोळी दिलेली असते तो त्यामध्येच गुंग झालेला असतो...

तसेच,

पायी, वारी, सण, उत्सव यांच्या नादी 

लावले जाते....।


मग, ताण (Tension)  आला कि दारूची दुकान जवळ असते....


करतो जीवन बरबाद...,

मग, स्वतःला दोष देतो ...


२) इथल्या स्त्रियांना आपण गुलाम आहोत हे कळू नये म्हणून...

भांडणे लावणाऱ्या मालिका,

 तसेच उपास- तापास, व्रत-वैकल्ये....

यांमध्ये त्या गुंग 

असतात ...


मग त्यांचे कुटुंब आणि 

त्या...


त्यांना मग कोण सहन होत नाही ...(सासू, सासरे)


३) इथला नौकरी असणारे पुरुष असतात...


ते घाण्याला लावलेल्या 

बैलासारखे राब-राब राबत असतात...


बँकेने दिलेले हफ्ते फेडण्यासाठी....


त्यालाच कळत नसते तो काय करतो ...

कारण, पगार जरी एक 

लाख असला तरी ८०,००० हफ्ते 

फेडण्यासाठी घालवत असतो ....।


एक बँकेचे कर्ज फेडले कि मग, बायको दुसरे (मोठे घर) कर्ज 

काढायला सांगते...


काम एवढे असते 

कि तो डोके वर काढू शकत नाही...



4) जेष्ट नागरिक ...

नोकरी करून शेवटी कुणीही त्याचे ऐकत नाही ...।


आश्रमाची वाट बघत असतो...


आणि,

जे लोकं जागरूक आहेत त्यांना...

अंधश्रद्धा निर्मुलन समिती, भ्रष्टाचार निर्मुलन समिती..


अनेक NGo मार्फत ..

वेगवेगळ्या पक्ष्याद्वारे गुंतून ठेवले जाते ...



मग कसा बदल होणार...?

कोण करणार...?


आता बाकी आहेत 

त्यांनी विचार करावा..


 केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते?

                             

 नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते?

                            


     केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार...😊

 

सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते? 


सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव...😊 


काय उपयोग सांग मानवा

अशा या दान धर्माचा ??😳


कधी शेतक-याला बियाणं

दान देऊन बघ... 😊


कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ.... 😊


कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन बघ... 😊


कधी एखाद्या उपाश्याला घlस भरवुन बघ...😊


कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ...😊


कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ...😊


कधी एखाद्या वृध्दाश्रमास

दान करून बघ....😊


कधी एखाद्या आश्रमातील

निराधारांवर प्रेम करून बघ...😊


एकदा दान धर्माच्या व्याख्या

बदलून तर बघ !!😊


जेव्हा मंदिरात आणि मस्जीद मध्ये जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल...😇


पुस्तकानं माणसाच मस्तक सशक्त होत...😇


सशक्त झालेलं मस्तक

कुणाच हस्तक होत नसत...😇


आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसत...! 😇


शाळेचे छत गळके आणि

मंदिराचे छत मात्र सोन्याचे ?😳


शाळेत आज मुलांना बसायला

साधी फरशी नाही मंदिराला मात्र संगमरवरी ?😳


शाळेला दोन रुपये देतांना दहा वेळा चौकश्या करणारा पालक मंदिराला दोन हजार देतांना अजिबात चौकशी करत नाही...😔


आपला भारत नक्की महासत्ता होणार?😳


पायात घालायची चप्पल AC मधे विकायला ठेवतात आणि

भाजीपाला फूटपाथवर...😔


म्हणे आमचा देश कृषी प्रधान

आणि आत्महत्या करतो शेतकरी...😔


शेकडो मैल चालतो वारकरी...😳


अन विठोबाचे पहिले दर्शन घेतो सत्ताधारी मंत्री..! 


वाचा,

विचार करा,

🙏🙏🙏

शनिवार, २७ जुलै, २०२४

एक विकत घ्या, त्यावर एक फुकट घ्या..*जर आपण *'राग'* विकत घेतला, तर आपल्याला *'ॲसिडिटी'* फुकट मिळते

*एक विकत घ्या, त्यावर एक फुकट घ्या..*
जर आपण  *'राग'* विकत घेतला, 
तर आपल्याला *'ॲसिडिटी'* फुकट मिळते.

जर आपण *'ईर्ष्या'* विकत घेतली, 
तर आपल्याला *'डोकेदुखी'* फुकट मिळते.

जर आपण *'द्वेष'* विकत घेतला, 
तर आपल्याला *'अल्सर'* फुकट मिळतो.

जर आपण  *'ताणतणाव'* विकत घेतला,
तर आपल्याला *'रक्तदाब (BP)'* फुकट मिळतो.

जर आपण *'विश्वास'* विकत घेतला, 
तर आपल्याला *'मैत्री'* फुकट मिळते.

जर आपण *'व्यायाम'* विकत घेतला,
तर आपल्याला *'निरोगी आयुष्य'* फुकट मिळते.

जर आपण *'शांती'* विकत घेतली, 
तर आपल्याला *'समृद्धी'* फुकट मिळते.

जर आपण *'प्रामाणिकपणा'* विकत घेतला, 
तर आपल्याला  *'झोप'* फुकट मिळते.

*आता हे सर्व आपल्यावर* अवलंबून आहे की, 
आपण काय विकत घेतलं पाहिजे....
*ते आपणचं ठरवायचं आहे.*

सोमवार, २२ जुलै, २०२४

पालक आपल्या मुलांवर ओझे असू शकतात. मुले त्यांच्यावर कधीच ओझे नसतात.

 वडिलांचे अचानक आगमन झाल्याने....

 बायकोला राग आल

 “म्हाताऱ्याला पैशाची गरज आहे असं दिसतंय, नाहीतर इथे कोण येणार होतं!  आमच्या पोटाचा खड्डा भरत नाही, तो तुमच्या घरच्यांच्या पोटात भरणार कुठून?

 मी नजर हटवली आणि दुसरीकडे पाहू लागलो.

 नळावर हात तोंड धुवून बाप प्रवासाचा थकवा दूर करत होता.

 यावेळी माझा हात थोडा घट्ट झाला.

 मोठ्या मुलाचा बूट फाटला आहे.  शाळेत जाताना तो रोज कुरकुर करतो.

 पत्नीच्या उपचारासाठी संपूर्ण औषधे खरेदी करता आली नाहीत.

 बाबूजींना ही आता यायचं होतं.

 घरात भयाण शांतता पसरली होती.

 जेवण झाल्यावर वडिलांनी मला त्यांच्या जवळ बसण्याचा इशारा केला.

 मला शंका आली की काहीतरी आर्थिक समस्या आली असावी.

 बाबा उठून खुर्चीवर बसले.

 पूर्णपणे बेफिकीर

 "ऐक 

 म्हणत त्याने माझे लक्ष त्याच्याकडे वळवले.

 श्वास रोखून मी तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो.  रोम-रोमा होऊन पुढचं वाक्य ऐकून मी सावध झालो.

 ते म्हणाले, “शेतीच्या कामात क्षणभरही मोकळा वेळ मिळत नाही.  सध्या कामाचा ताण आहे  रात्रीच्या ट्रेनने परत जाणार.  तीन महिन्यांपासून तुमचे कोणतेही पत्र आलेले नाही.  जेव्हा तुम्ही चिंतेत असता तेव्हा हे करता."

 बाबूजी ने खिशातून शंभरची नोट ची बंडल काढली आणि माझ्यापुढे केली,

 ठेवा.  तुम्हाला उपयोगी पडेल.  भाताचे पीक चांगले आले.

 घरी काही अडचण नाही.

 तू खूप अशक्त दिसत आहेस.  व्यवस्थित खा आणि प्या.  तुझ्या सुनेची पण काळजी घे."

 मला काहीच बोलता येत नव्हते.  शब्द माझ्या घशात अडकले होतें.

 मी काही बोलायच्या आधीच वडिलांनी मला प्रेमाने रागावले.

 "घ्या.  तुम्ही मोठे झाले ना आता?

 "नाहीतर." मी हात पुढे केला. बाबांनी माझ्या तळहातावर नोटा ठेवल्या.

 वर्षापुर्वी माझे वडील मला शाळेत जातांना असे पैसे हातावर देत असत, पण तेव्हा माझे डोळे आजच्यासारखे खाली जात नव्हते.😥😥


 मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की


पालक आपल्या मुलांवर ओझे असू शकतात.

 मुले त्यांच्यावर कधीच ओझे नसतात.,❤️❤️

~अनामिक

कथाविश्व - नाते संबंध दृढ करायला शिकवणारे आपले कथांचे विश्व🎉

gito 7057573102

रविवार, २१ जुलै, २०२४

म्हातारपण येणे

म्हातारपण येणे*

[20/07, 06:49] Rajan  Patwardhan: मला आज वाचनात आलेला उत्तम लेख 

'            *म्हातारपण येणे*            '

*" हा लेख फक्त वयोवृद्ध लोकांसाठीच आहे असे नव्हे, तर सर्वांनी आवर्जून वाचावा असा आहे. म्हातारपण येणे ही एक सत्य स्थिती आहे आणि त्याला आनंदाने सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी आधीपासूनच पावले उचलणे का आवश्यक आहे, काय करायला पाहिजे, हे समजावून सांगणाऱ्या कादंबरीची ही एक संक्षिप्त ओळख. "*  

*"The Sky Gets Dark, Slowly." हळूहळू आभाळ गडद होत चालले आहे, संधिकाल होऊ लागला आहे.*

*'Mao Dun साहित्य पुरस्कार' मिळालेले "श्री Zhou Daxin" यांची नवी कादंबरी “The Sky Gets Dark, Slowly” लवकरच प्रकाशित होत आहे. वृद्धापकाळातील परिस्थितीचा संवेदनशील शोध घेण्याचा हा एक प्रयत्न आहे, तसेच वेगाने वृद्ध होणाऱ्या लोकांमधील लपलेल्या पण व्यक्त न होणाऱ्या जटिल अशा भावना उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कादंबरीत केला आहे.*  
 
त्यात त्यांनी असे म्हंटले आहे की बरेचसे वयोवृद्ध असे वागतात बोलतात की त्यांना जणू काही सगळेच माहित आहे. पण अशा उतार वयात ते लहान मुलांइतकेच अज्ञानी असतात. बऱ्याच वयोवृद्ध लोकांना आपल्यावर काय प्रसंग गुजरणार आहे, किंवा आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे हे माहित नसते व म्हणूनच त्या दृष्टीने त्यांनी काहीच तयारी केलेली नसते. .

*वयाची ६० वर्षे उलटल्यावर  व त्यानंतर हळूहळू वय वाढत जाऊन शेवटचा श्वास घेईपर्यंतच्या काळात अशा वृद्ध व्यक्तींनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक व शारीरिक तयारी होईल व घाबरून जाण्याचे काही कारण सुद्धा राहणार नाही.*

*१.* :-  जस-जसे वय वाढत जाते तस-तसे तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या जवळचे असणारे लोक हळू हळू कमी होतील. तुमच्या आई-वडिलांच्या आणि आजी-आजोबांच्या पिढीतील बऱ्याच जणांनी हे जग सोडले असेल, व समवयस्क असलेल्या तुमच्या आप्तांना व मित्रांना स्वतःकडे बघणे सुद्धा जड जाऊ लागेल. तरुण पिढी त्यांच्या कामात, त्यांच्या जीवनात व्यग्र-व्यस्त असेल. तुमच्या जीवनाचा जोडीदार सुद्धा कदाचित हे जग तुमच्या आधी किंवा तुमच्या अपेक्षेपूर्वीच सोडून गेलेला असेल. आणि यानंतर काय उरते तर एक नको वाटणारा एकटेपणा. अशा एकटेपणाच्या परिस्थितीत कसे जगायचे, एकटेपणाला सामोरे जाऊन उर्वरितजीवनातील आनंद कसा मिळवायचा, हे तुम्ही शिकून घेतले पाहिजे, त्यासाठी मानसिक तयारी केली पाहिजे.    
*२.* :-  उतार वयात समाज तुमच्याकडे क्वचितच लक्ष देईल किंवा तुम्हाला दुर्लक्षित करेल. तुमच्या पूर्वायुष्यात तुम्ही कितीही मोठे पद भूषवले असेल, अथवा समाजातील कितीही प्रसिद्ध व्यक्ती तुम्ही असाल, तरीही निसर्ग नियमाप्रमाणे तुम्हाला वार्धक्य हे येणारच आणि वार्धक्यात तुमच्या आजू-बाजूला घोटाळणारे लोक, तुमची हांजी-हांजी करणारे लोक तुमच्या पासून लांबच राहतील व तुम्हाला एका कोपऱ्यात गप्प उभे राहण्याची वेळ येईल. तुमच्या समोर, तुमच्या आजूबाजूला जे काही चालले आहे त्याचे कुठलाही मत्सर न दाखवता, काहीही तक्रार न करता कौतुक करणे, त्याला पसंती दर्शवणे, हेच अशा उतार वयात तुमच्या हातात आहे.
*३.* :-  वय झाल्यावर आता पुढचा रस्ता अडचणींचा व अडथळ्यांचा आहे. हाडे कमकुवत होणे, हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, मेंदूसंबंधी विविध विकार, कर्करोग व इतर अनेक आजार तुमचे पाहुणे म्हणून तुमच्यासमोर कधीही उभे राहू शकतात व त्यांना तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुमचे आजार, तुमची दुखणी-खुपणी यांना तुमचे मित्र समजा, कारण यांच्याबरोबरच आता तुम्हाला उर्वरित आयुष्य काढायचे आहे. तुम्हाला कुठलाही शारीरिक त्रास होणार नाही अशाभ्रमात राहूनका. पण सकारात्मक मानसिकता ठेवणे, योग्य आहार-विहार करणे हे तुमचे आता कर्तव्य आहे. आणि यात सातत्यठेवण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित ठेवणे तुम्हाला गरजेचे आहे.    

*४.* :-  एखाद्या बालकाप्रमाणे आता आपले आयुष्य बहुतांशी पलंगावरच व्यतीत होणार आहे, ह्याची तयारी ठेवा. आपण मातेच्या गर्भातून ह्या जगात आलो ते प्रथम पलंगावरच. आणि त्यानंतर जीवनातील असंख्य चढ-उतार, हेलकावे, जीवनसंघर्ष वगैरेचा अनुभव घेऊन आपण आपल्या प्रारंभ बिंदूकडे, पलंगाकडे येतो. इतरांना आपली काळजी घ्यावी लागणार ह्या अवस्थेत असा वयस्कर माणूस पुन्हा येऊन पोचतो, फरक एवढाच असतो की बालपणात आपली काळजी घ्यायला आपली आई होती, पण ह्या टप्प्यावर असे कोणी असण्याची शाश्वती नाही. असे कोणी असले तरी ते आपल्या आईसारखी काळजी घेतील अथवा नाही याची शंकाच असते. परिचारिका 'nursing staff' वगैरेंवर अवलंबून राहण्याची वेळ वृद्धापकाळात येऊ शकते, पण त्यांच्या जवळ आईची माया कुठून असणार? चेहऱ्यावर हास्य ठेवून उपकार केल्याच्या भावनेने, कंटाळून, त्या परिचारिका तुमची सेवा करतील. पण अशाही कठीण परिस्थितीमध्ये शांत रहा व न विसरता कृतज्ञता व्यक्त करा.  

*५.* :-  आता जीवनमार्गातील शेवटच्या काळात तुम्हाला त्रास देणारे, तुम्हाला फसवणारे लोक भेटतीलच. त्यातील बहुतेक जणांना माहित असेल की तुम्ही बऱ्यापैकी संपत्ती जमा केली आहे, आणि तुम्ही जमवलेले हे पैसे तुमच्याकडून हिसकावून घ्यायला काय करावे याचाच विचार असे लोक करत असतील. तुम्हाला खोटे फोन करतील, टेक्स्ट मेसेजेस पाठवतील, ई-मेल करतील. तुम्हाला विविध अन्नपदार्थ किंवा वस्तूंची प्रलोभने दाखवतील, 'लवकर श्रीमंत व्हा' यासारख्या योजना तुमच्या समोर ठेवून तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करतील, दीर्घायुष्यासाठी काही नवीन उत्पादने घेण्यासाठी तुम्हाला भाग पाडतील, वगैरे वगैरे. थोडक्यात म्हणजे तुमच्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी अशी लोकं कुठल्याही थराला जातील. म्हणूनच सावध राहा, काळजी घ्या,आपल्या संपत्तीला कोणालाही हात लावू देऊ नका. शहाणपणाने वागला नाहीत तर तुमचे पैसे तुमच्यापासून दूर जायला वेळ लागणार नाही, म्हणून ह्या वयात काटकसरीने व हुशारीने पैशाचे व्यवहार करा.

शेवटची घटिका येण्यापूर्वी, आयुष्यातील संधीकालात, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर सर्वकाही अंधारून आल्यासारखे वाटेल, आणि ते साहजिकच आहे. पुढील मार्ग दिसणे कठीण होऊन जाईल व त्यामुळे पुढील वाटचाल सुद्धा सोपी असणार नाही. आणि म्हणूनच, *एकदा का वयाची ६० वर्षे पार झाली की मग आयुष्य जसे आहे तसे बघण्याचा प्रयत्न करा, आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घ्या, शक्य असेल तोपर्यंत आयुष्याची मजा अनुभवा. समाजातील कुठलेही ओझे अंगावर घेऊ नका. मुलांमध्ये नातवंडामध्ये अडकून राहू नका. वागणूक साधी व नम्र ठेवा, आपण वयाने मोठे आहोत म्हणून आपण फार शहाणे आहोत असे समजू नका* व तसे इतरांना दाखवू पण नका. *उद्धटपणे इतरांशी बोलू नका कारण त्याचा त्रास इतरांना होईलच, पण तुम्हाला त्याचा त्रास जास्त होईल.* आपले वय जस-जसे वाढत जाते तस-तसे आदर म्हणजे काय व त्याचे महत्व समजून घेणे अत्यावश्यक आहे. *कुठल्याही वस्तूची किंवा व्यक्तीची आसक्ती न ठेवणे किती गरजेचे आहे हे लक्षात घेणे अशा उतार वयात आवश्यक आहे व तशीच आपली मानसिकता ठेवणे गरजेचे आहे.* निसर्गाचा मार्ग म्हणजेच जगण्याचा मार्ग. त्याच प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करीत , जीवनातील शेवटच्या टप्प्यावरील आपले मार्गक्रमण संतुलित करा.    
 
आपण सर्वांनी वाचावे असेच हे पुस्तक आहे, खूप छान, खूप सुंदर

आत्ताच दिवस सुरु झाला ... आणि बघता बघता संध्याकाळचे ६ वाजले.
काल सोमवार होता असे वाटत होते ... आणि आज शुक्रवार आला सुद्धा.  

*... महिना संपत आला,*
*... वर्ष संपायला आले,*
*...आणि वयाची ५०, ६०, ७० वर्षे केव्हां निघून गेली हे कळलेच नाही*
*..आपले आई-वडील,आपले आप्तस्वकीय, मित्र वगैरे हे जग सोडून गेले आणि मग समजेना की आता मागे कसे फिरायचे?*  

चला तर मग, जो काही वेळ आता आपल्याकडे उरला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घेऊ.
*आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचे नाही ...*
*आपल्या आयुष्यात रंग भरुया ...* 
*छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेऊया ...*  
*हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करूया ...*  

उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे
तरमग कुठलीही कृती पुढे ढकलू नका
*... हे नंतर करेन*
*... हे नंतर सांगीन*
*... यावर नंतर विचार करेन*  
'नंतर' आपल्या हातात आहे असे समजूनच आपण पुढे ढकलतो ना सगळे .....
कारण, आपण हे समजून घेत नाही की
चहा थंड झाल्यानंतर ...
प्राधान्य बदलल्यानंतर ...
उत्साह निघून गेल्यानंतर...
आरोग्य बिघडल्यानंतर ...
मुले वयात आल्यानंतर ...
आई-वडील म्हातारे झाल्यानंतर ...  
आश्वासन न पाळल्यानंतर...
दिवसाची रात्र झाल्यानंतर ...
आयुष्य संपल्यानंतर ...
आणि ह्या सगळ्या 'नंतर'  आपल्याला कळते अरे बापरे... उशीर झाला की ...  

*"आणि म्हणूनच 'नंतर' काही ठेवू  नका. 'नंतर' ने 'अंतर' वाढते व चांगल्या गोष्टी,*     *चांगले क्षण हातातून निसटून जातात उदाहरणार्थ...उत्तम अनुभव, उत्तम मित्रमंडळी, उत्तम कुटुंब"*

*दिवस आजचा ... आणि क्षण आत्ताचा ...*  

*आजची गोष्ट उद्यावर ढकलणे आपल्याला झेपणारे नाही, कारण आता आपले वय उतरणीस लागलेय.*

तर बघूया की वेळ न दवडता हा संदेश इतर लोकांपर्यंत कोण कोण पोचवत आहे? कारण, *हा संदेश नंतर पाठवीन असा कोणी विचार केला तर ... तर कदाचित  पुढे कधीच पाठविला जाणार नाही.*

*जे वयस्कर नाहीत त्यांच्या पर्यंत सुद्धा हा संदेश पोहोचावा.*

*सर्वजण आरोग्य संपन्न व आनंदी राहोत हीच सदिच्छा.*  
               😔🙏😌

=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=--=-
कुठेतरी छानसे वाचलेले..

चांगले म्हणुन काॅपी पेस्ट केले..
[20/07, 06:51] Rajan  Patwardhan: आभार श्री शरदचंद्र रिसवाडकर ,कांदिवलीपश्र्चिम ,ब्लू एरिया !

मंगळवार, २ जुलै, २०२४

शरीर मृत होण्या आधीच आलिंगन द्या आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू

 शरीर मृत होण्या आधीच आलिंगन द्या

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू 




डोक्यात राग भरल्यावर 

फुटणार कसं हसू ?

अहंकार बाळगू नका 

भेटा बसा बोला 

मेल्यावर रडण्यापेक्षा

जिवंतपणी बोला 

नातं आपलं कोणतं आहे

महत्वाचे नाही

प्रश्न आहे कधीतरी

गोड बोलतो का नाही ?

चुका शोधत बसाल तर

सुख मिळणार नाही 

चूक काय बरोबर काय

कधीच कळणार नाही 

काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू .....ll 1 ll

चल निघ चालता हो

इथे थांबू नको

हात जोडून विनंती आहे

अशी भाषा नको

दारात पाय नको ठेऊ 

तोंड नाही पहाणार 

खरं सांगा असं वागून 

कोण सुखी होणार ?

तू तिकडे आम्ही इकडे

म्हणणं सोपं असतं

पोखरलेलं मन कधीच 

सुखी होत नसतं

सुखाचा अभास म्हणजे 

खरं सुख नाही 

आपलं माणूस आपलं नसणे

दुसरं दुःख नाही 

करमत नाही घरी म्हणून गाळू नका आसु

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू ....ll 2 ll

एकतर्फी प्रेम करून

उपयोग आहे का ?

समोरच्याला आपली आठवण

कधी तरी येते का ?

नातं टिकलं पाहिजे असं

दोघांनाही वाटावं

कधी गायीने कधी वासराने 

एकमेकाला चाटावं

तुमची काहीच चूक नाही 

असं कसं असेल 

पारा शांत झाल्यावरच 

सत्य काय ते दिसेल 

बघा जरा एकांतात

डोळे मिटून आत

चूक कबूल करतांना

जोडताल दोन्ही हात

अंधारात अश्रू ढाळत खरंच नका बसू

आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू .....ll 3 ll

दुसऱ्याला दोष देणं

खूप सोपं असतं

वेळ आल्यावर कळतं की

कुणी कुणाचं नसतं

भेटत नाहीत बोलत नाहीत

गुन्हा तरी काय ?

जे वाटतं ते बोलून

रड धाय धाय

शक्य आहे ताण जाऊन

वाटेल हलकं हलकं

गुळणी धरून बसू नका

व्हा थोडं बोलकं

कोण चूक कोण बरोबर

हिशोब करून टाका

प्रत्येक क्षण जगून घ्या

घालवू नका मोका

त्याच त्याच गोष्टींचे पत्ते नका पिसू

आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू ....ll 4 ll

आपली मतं दुसऱ्यावर

मुळीच लादू नका

समोरच्या व्यक्तीचा

अंत बघू नका

कोणताही विषय असो

जास्त नका ताणू

मीच शहाणा बाकी मूर्ख

असे नका मानू

कोण म्हणतं गोड बोलून

प्रश्न सुटत नाही

अनेकदा समजूतदार

माणूस भेटत नाही

जिभेवर साखर ठेवा

होणार नाही वाद

आवडल्यावर मनातून

द्या की हो दाद

तडतड बोलून उगीच मनं नका नासु

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू ....ll 5 ll

बचतच कामी येते

खर्च कमी कर

जरी मोठा झालास तरी

रहा जमिनीवर

विचार करून पाऊल टाका , कुठे नका फसू

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू ....ll 6 ll

ठीक आहे चूक नाही 

तरीही जुळतं घ्या 

बॉडी डेड होण्या आधीच 

आलिंगन द्या

स्मशानभूमीत चांगलं बोलून

काय उपयोग आहे 

जिवंतपणी कसे वागलात

जास्त महत्वाचं आहे

माझ्या कवितेत कोणतंही

तत्वज्ञान नाही 

तुम्ही खुशाल म्हणू शकता

कवीला भान नाही

ठीक आहे तुमचा आरोप

मान्य आहे मला

माझं म्हणणं एवढंच आहे

वाद नको बोला 

काय माहीत उद्या

आपण असू किंवा नसू

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू ll 7 ll


GITO 7057573102

रविवार, ३० जून, २०२४

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स .. तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर ..*

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स .. तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर ..* 

*आर्टिफिशिअल इंटेलिजन्स .. तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर ..* 
*- अच्युत गोडबोले*

*आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता काय करू शकते, ह्याची चुणुक जगाला दिसू लागली आहे ..!!* 

*ह्या तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ म्हणवले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन ह्यांनी त्याविषयीची भीती व्यक्त केली आहे. ‘एआय’ काय आहे, ते विनाशक का होऊ शकते याविषयी ..* 

👇 

*"कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (एआय) मी जे काम केले, त्याबद्दल मला थोडा खेदच वाटतो" हे उद्गार आहेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ असे बिरूद लाभलेले डॉ. जेफ्री हिंटन ह्यांचे ..!!* 

*गुगल मधून राजीनामा देताना, 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’, आणि त्या तंत्राच्या भयावह शक्यता ह्या विषयी बोलताना नोकरीमध्ये असताना मर्यादा येतील, म्हणून राजीनामा देत आहे ..!!"* 

*मी ह्याला ‘तिसरा स्फोट’ म्हणतो ..!!* 

*सन १८९६च्या आसपास ‘डायनामाइट’चा शोध लावणाऱ्या आल्फ्रेड नोबेलचा स्फोट पहिला ..!!*  

*सन १९४५ मध्ये ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’मधील अणुबॉम्बचा शोध लावणारा ओपेनहाइमरचा स्फोट दुसरा ..!!* 

*आल्फ्रेड नोबेलच्या भावाचे निधन झाल्यानंतर, आल्फ्रेडचेच निधन झाले आहे असे समजून एका वृत्तपत्राने,  ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याचे निधन’ अशी बातमी छापली ..!!* 

*आपण मेल्यावर जग आपल्याला कसे ओळखेल, आठवेल ह्या विषयीची ‘याची देही, याची डोळा’ जाणीव झाल्यानंतर उपरती झालेल्या आल्फ्रेडने, पाप-क्षालनासाठी ‘नोबेल पारितोषिका’ची घोषणा केली ..!!* 

*गंमत म्हणजे ह्याच नोबेल पारितोषिकासाठी १९४६, १९५१, १९६७ असे तीन वेळा नामांकन मिळालेल्या; परंतु पुरस्कार मिळू न शकलेल्या रॉबर्ट ओपेनहाइमरने अणुबॉम्ब बनवला. त्याचा स्फोट ‘डायनामाइट’पेक्षा कित्येक पट विध्वंसक होता. त्यानंतर त्या संशोधनाच्या विनाशक शक्तीमुळे, ओपेनहाइमरने खेद व्यक्त केला होता ..!!* 

*आताचा डॉ. जेफ्री हिंटन ह्यांचा राजीनामा आणि त्यानंतरची 'खेदयुक्त काळजी' हा ‘एआय’ तंत्राच्या अजूनही अव्यक्त; पण नजीकच्या भविष्यातील महास्फोटाची जणू नांदीच ..!!* 

*इतकी वर्षे ‘गूगल’मध्ये कार्यरत असूनही, त्याने आत्ताच राजीनामा देण्याची मला तीन कारणे वाटतात. पहिले म्हणजे ..* 

*‘एआय’मुळे नजिकच्या काळात जवळजवळ ६० ते ८० टक्के नोकऱ्या कमी होण्याचे भाकित वर्तविले जात आहे ..!! त्यामुळे प्रचंड सामाजिक अस्थैर्य निर्माण होईल ..!!* 

*दुसरे म्हणजे, अलीकडेच ‘चॅट जीपीटी’ आणि ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’ने (एलएलएम) घातलेला धुमाकूळ ..!!*  

*आणि ..* 

*तिसरे म्हणजे, ह्या अत्यंत प्रगत ‘एआय’मुळे तयार होत असलेल्या विध्वंसक शस्त्रांची भीती ..!!* 

*‘स्वार्म तंत्रज्ञान’, म्हणजे अनेक छोटे ड्रोन एकत्रित काम करतात ..!! एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र दिल्यास, हे सारे छोटे ड्रोन एकत्र काम करून त्या व्यक्तीला ठार करू शकतात ..!! ह्या हल्ल्यातून बचाव होणे शक्य नाही ..!!* 

*ही तिन्ही कारणे ज्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाली त्यात, डॉ. हिंटन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे ..!!* 

*‘चॅट जीपीटी’ आणि ‘डीप फेक’ तंत्रज्ञानासारख्या गोष्टींमुळे, सोशल मीडियावर बनावट छायाचित्रे, व्हिडिओ, मजकूर यांचा अनिर्बंध सुळसुळाट होण्याची नुसती शक्यताच नव्हे, तर अनेक शास्त्रज्ञांना खात्री वाटते ..!! हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वाईट हेतू असणाऱ्या, आसुरी महत्त्वाकांक्षेने प्रेरीत लोकांच्या हाती पडल्यास, जगाचा विनाश अटळ आहे, याबाबतही त्यांच्यात एकवाक्यता आहे ..!!* 

*याच्याही पुढे जात ..* 

*'जगाचा विनाश होईल का ..??*  

*ह्यापेक्षा ..* 

*‘कधी होईल' ..??’* 

*एव्हढेच विचारणे आपल्या हातात आहे, अशी भीतीही अनेक विचारवंत व्यक्त करीत आहेत ..!!* 

*ह्याच प्रकारची विधाने, काळजीयुक्त भाषणे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि प्रसिद्ध तंत्रज्ञ-उद्योजक इलॉन मस्क, बिल गेट्स करीत आहेत ..!! आपण ती ऐकत आणि वाचत आहोत ..!!* 

*व्हाइट हाउसने नुकतेच ‘गूगल’चे सुंदर पिचाई आणि ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला  ह्यांना ‘एआय’चा जबाबदारीपूर्वक वापर करणे आणि त्यासाठीचा आराखडा करणे, ह्यासंबंधी बोलावले होते. त्या बैठकीत ‘ओपन एआय’च्या (‘चॅट जीपीटी’ची जनक कंपनी) सॅम आल्टमनबरोबरच अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिसही उपस्थित होत्या. ‘विश्वासार्ह एआय’साठी व्हाइट हाउसने १४ कोटी डॉलर जाहीर केले आहेत ..!!* 

*‘एआय’ची उपशाखा असणारी ‘न्यूरल नेटवर्क’ खूप जुनी आहे. ‘न्यूरल नेटवर्क’ अती-प्रगत करण्यात, तिचे २०१२मध्ये ‘डीप लर्निंग’मध्ये रूपांतर करण्यात, डॉ. हिंटन ह्यांचे मोलाचे योगदान आहे. ह्या ‘डीप लर्निंग’ प्रकारामुळे आज ही परिस्थिती ओढावली आहे ..!!*  

*डॉ. हिंटन म्हणतात की, हे तंत्रज्ञान मानवापेक्षाही पुढे जाईल, अशी शक्यता आहे आणि ती खूप भयावह आहे ..!!* 

*काही दिवसांपूर्वी ‘सॅमसंग’ कंपनीने ‘चॅट जीपीटी’च्या वापरावर बंदी घातली ..!!* 

*वॉरन बफे या गुंतवणूक क्षेत्रातील अग्रेसर सीईओने तर ‘एआय’ला ‘दुसरा अणुबॉम्ब’ म्हटले आहे ..!!* 

*‘एआय’ तंत्रज्ञानामुळे ६० ते ८० टक्के लोकांच्या हातचे काम जाईल, ते बेरोजगार होतील, ह्याच्या अनेक पाऊलखुणा दिसत आहेत ..!!* 

*‘रायटर्स गिल्ड’ या अमेरिकेतील लेखकांच्या संघटनेने नुकत्याच काढलेल्या मोर्चाने हे दाखवून दिले. ‘चॅट जीपीटी’ कथा, पटकथा लिहून देणार असेल, तर ह्या लेखकांना कोण मानधन देणार ..??* 

*परवाचीच बातमी आहे, की ब्रिटनमध्ये गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्यापेक्षा ‘चॅट जीपीटी’ने गुंतवणुकीवर अधिक परतावा दिला ..!!* 

*‘सोनी’च्या छायाचित्र स्पर्धेत प्रथम पारितोषिक जाहीर झालेल्या जर्मन छायाचित्रकाराने ते नम्रपणे नाकारले; कारण ती ‘एआय’ची कलाकृती होती ..!!* 

*‘एआय’, ‘बिग डेटा’, ‘क्लाउड’ इत्यादींचा समुच्चय असणारी, २०१३मध्ये अस्तित्वात आलेली चौथी औद्योगिक क्रांती म्हणजेच ‘इंडस्ट्री ४.०’ किंवा ‘आय ४’ ..!!* 

*ह्याला मागे टाकत, दहा वर्षांत ‘इंडस्ट्री ५.०’ उदयाला आली आहे. ह्यामध्ये मानव आणि यंत्र-तंत्र-रोबो एकत्र काम करतील. याला ‘कोबॉट’ म्हणतात. ‘कोबॉट’मुळे जीवन सुखावह (की आळशी ..??) झाले, तरी असंख्य नोकऱ्यांवर गदा येऊन, सामाजिक अस्थैर्य वाढेल ..!!* 

*प्रख्यात मानववंश शास्त्रज्ञ युवल हरारी (‘सेपियन्स’चा लेखक) ह्याने एका ‘टेड टॉक’मध्ये म्हटले आहे की, ९० टक्के लोकांना भविष्यात काही कामच नसेल ..!!* 

*यावर काहीसा उपाय म्हणून बिल गेट्स यांनी ‘एआय एथिक्स ग्रुप’ सुचवला आहे ..!! त्यांनी असेही म्हटले आहे की, एखाद्या उद्योगाने लोकांना काढून रोबोंना काम दिले तर, त्यांना ‘रोबो कर’ लावण्यात यावा ..!!* 

*‘एआय’वरील संशोधन सहा महिने थांबवावे, असे अनेक तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंत सुचवत आहेत ..!! तंत्रज्ञानाने केलेली कलाकृती वा काम,  आणि मानवाने केलेले काम,  ह्यांत फरक करता आला नाही तर, त्याला ‘ट्युरिंग टेस्ट’ म्हणतात ..!!* 

*‘कोबॉट’ या ‘इंडस्ट्री ५.०’मधील तंत्रज्ञानात आपण तेथपर्यंत पोहोचलो आहोत. डॉ. जेफ्री हिंटन हे ‘ट्युरिंग पुरस्कार’ विजेते आहेत ..!!* 

*एवढे सामाजिक अस्थैर्य, विध्वंस होणार असेल तर,  ‘एआय’ करायचेच कशाला, असा प्रश्न मनात उद्भवू शकतो ..!! शेवटी ती मानवाचीच निर्मिती आहे, आणि त्याचे उत्तर दडले आहे लोभीपणात ..!!* 

*‘एआय’मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना, त्यांच्या भागधारकांना उत्तम परतावा देऊन, स्वत:ची तुंबडी भरायची आहे. जगात अस्थैर्य निर्माण होईल वगैरे तात्त्विक गोष्टींत त्यांना रस नसून, त्यांच्यात ‘एआय’मधील अग्रणी होण्याची उघडी-नागडी स्पर्धा आहे, हे नि:संशय ..!!* 

*या स्पर्धेत आपण टिकून राहण्यासाठी शिक्षण-पद्धतीत शिक्षकांनी ‘गूगल’ व्हावे आणि विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’ ..!!  म्हणजेच शिक्षकांनी ‘गूगल’पलीकडचे ज्ञान द्यावे आणि, विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’चा वापर करावा; पण त्यावर पूर्ण अवलंबून न राहता स्वत:चा तरतम भाव वापरावा ..!!* 

*ह्या पुढे आपली स्पर्धा ‘एआय’शी असणार आहेच; त्याहीपेक्षा ती ‘एआय’बरोबर काम करणाऱ्या मानवांशी अधिक असेल ..!!* 

🙏🙏https://whatsapp.com/channel/0029Va6C2CgLdQeZKIu1kn1L

*- अच्युत गोडबोले*